राष्ट्रीय

तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के कर; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

प. बंगाल, बिहार व उत्तर प्रदेश या मोठ्या तांदुळ उत्पादक भागात यंदा पाऊस कमी झाला.

वृत्तसंस्था

भारतात तांदळाच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के कर लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी घेतला. सरकारने तांदळाच्या विविध दर्जानुसार, निर्यातीवर २० टक्के कर लावला आहे. प. बंगाल, बिहार व उत्तर प्रदेश या मोठ्या तांदुळ उत्पादक भागात यंदा पाऊस कमी झाला.त्यामुळे तांदळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. तांदुळ निर्यातीवर कोणतेही प्रतिबंध लावण्याची योजना नाही, असे केंद्र सरकारने यापूर्वी सांगितले होते. सरकारकडे देशातील मागणीचा पुरवठा करण्यासाठी पुरेसा बफर साठा आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसरा मोठा तांदुळ उत्पादक आहे. भारताने २०२१-२२ मध्ये २१.२ दशलक्ष टन तांदळाची निर्यात केली.

यंदा पाऊस कमी झाल्याने तांदळाची पेरणी ६ टक्क्याने घटून ३६७.५५ लाख हेक्टर झाली. झारखंड (१०.५१ लाख हेक्टर), प. बंगाल (४.६२ लाख हेक्टर), छत्तीसगड (३.४५ लाख हेक्टर), उत्तर प्रदेश (२.६३ लाख हेक्टर) आणि बिहारमध्ये यंदा कमी पेरणी झाली. यापूर्वी केंद्र सरकारने गव्हावर निर्यातबंदी घातली होती.

तुकाराम मुंढेंच्या FDA ची आता महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यामधील अन्न गुणवत्तेवर करडी नजर; 'स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स' लागू

ठाण्यात उद्या ‘थर’थराट; दहीहंडीनिमित्त ठाण्यात कडेकोट बंदोबस्त, २३०७ पोलीस तैनात

Ratnagiri : रघुवीर घाटात दरड कोसळली; एसटी बस घाटातच अडकली, १५ ते २० गावांचा संपर्क तुटला, Video

Mumbai : सप्टेंबर अखेरपर्यंत सायन पूल खुला करण्याचे नियोजन; पुलाच्या दोन्ही बाजूला व्हर्टिकल गार्डनचा पर्याय - महापौर रितू तावडे

IAS Officer Transfer : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या