राष्ट्रीय

तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के कर; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

प. बंगाल, बिहार व उत्तर प्रदेश या मोठ्या तांदुळ उत्पादक भागात यंदा पाऊस कमी झाला.

वृत्तसंस्था

भारतात तांदळाच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के कर लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी घेतला. सरकारने तांदळाच्या विविध दर्जानुसार, निर्यातीवर २० टक्के कर लावला आहे. प. बंगाल, बिहार व उत्तर प्रदेश या मोठ्या तांदुळ उत्पादक भागात यंदा पाऊस कमी झाला.त्यामुळे तांदळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. तांदुळ निर्यातीवर कोणतेही प्रतिबंध लावण्याची योजना नाही, असे केंद्र सरकारने यापूर्वी सांगितले होते. सरकारकडे देशातील मागणीचा पुरवठा करण्यासाठी पुरेसा बफर साठा आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसरा मोठा तांदुळ उत्पादक आहे. भारताने २०२१-२२ मध्ये २१.२ दशलक्ष टन तांदळाची निर्यात केली.

यंदा पाऊस कमी झाल्याने तांदळाची पेरणी ६ टक्क्याने घटून ३६७.५५ लाख हेक्टर झाली. झारखंड (१०.५१ लाख हेक्टर), प. बंगाल (४.६२ लाख हेक्टर), छत्तीसगड (३.४५ लाख हेक्टर), उत्तर प्रदेश (२.६३ लाख हेक्टर) आणि बिहारमध्ये यंदा कमी पेरणी झाली. यापूर्वी केंद्र सरकारने गव्हावर निर्यातबंदी घातली होती.

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

निवडणूक आयोगाला फक्त चिन्ह देण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंची टीका

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार