राष्ट्रीय

तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के कर; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

प. बंगाल, बिहार व उत्तर प्रदेश या मोठ्या तांदुळ उत्पादक भागात यंदा पाऊस कमी झाला.

वृत्तसंस्था

भारतात तांदळाच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के कर लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी घेतला. सरकारने तांदळाच्या विविध दर्जानुसार, निर्यातीवर २० टक्के कर लावला आहे. प. बंगाल, बिहार व उत्तर प्रदेश या मोठ्या तांदुळ उत्पादक भागात यंदा पाऊस कमी झाला.त्यामुळे तांदळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. तांदुळ निर्यातीवर कोणतेही प्रतिबंध लावण्याची योजना नाही, असे केंद्र सरकारने यापूर्वी सांगितले होते. सरकारकडे देशातील मागणीचा पुरवठा करण्यासाठी पुरेसा बफर साठा आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसरा मोठा तांदुळ उत्पादक आहे. भारताने २०२१-२२ मध्ये २१.२ दशलक्ष टन तांदळाची निर्यात केली.

यंदा पाऊस कमी झाल्याने तांदळाची पेरणी ६ टक्क्याने घटून ३६७.५५ लाख हेक्टर झाली. झारखंड (१०.५१ लाख हेक्टर), प. बंगाल (४.६२ लाख हेक्टर), छत्तीसगड (३.४५ लाख हेक्टर), उत्तर प्रदेश (२.६३ लाख हेक्टर) आणि बिहारमध्ये यंदा कमी पेरणी झाली. यापूर्वी केंद्र सरकारने गव्हावर निर्यातबंदी घातली होती.

Mumbai : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा अन् नववर्षाचा जल्लोष; मुंबई, ठाणे, डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रा

Air Travel Alert : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' ४ विमानतळांवर बंदी; फ्लाइट्सवर होणार परिणाम

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खरेदी धोरणावर परिणाम होणार

Nagpur : मॅट्रिमोनियल साईटवरील ओळख महागात पडली; मॉर्फ अश्लील व्हिडिओने ३६ वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल

भिवंडीत फर्निचर मार्केटला भीषण आग; अनेक दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली