राष्ट्रीय

उत्तर प्रदेशात धुक्यामुळे अपघातात ३ जण ठार

घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले

Swapnil S

शहाजहांपूर : उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे झालेल्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शाहजहांपूर जिल्ह्यात एक ट्रॅक्टर-ट्रॉली कल्व्हर्टखाली उलटली, ज्यामुळे त्यातील दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी दिली. पोलीस अधीक्षक अशोक कुमार मीना यांनी सांगितले की, बाजारात बटाटे विकल्यानंतर नरवीर (२८) आणि नीरज (३०) हे दोघे शेतकरी मिर्झापूर पोलीस ठाणे हद्दीतील छपरा येथील रहिवासी ट्रॅक्टरमधून त्यांच्या गावी परत जात होते. शुक्रवारी रात्री धुक्यामुळे कोला रोडवरील कल्व्हर्टवर ट्रॉली रस्त्यावरून पडली. घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले आणि रात्रीच क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर काढला, ज्याखाली दोघेही मृतावस्थेत आढळले.

दरम्यान, एटा येथे, निधौली रोडवर असलेल्या आयटीआय महाविद्यालयाजवळ दाट धुक्यामुळे विजेच्या खांबाला धडकल्याने दुचाकी चालवणाऱ्या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याच्या काकांसह इतर दोघे जखमी झाले. शुक्रवारी संध्याकाळी दुचाकी विजेच्या खांबाला धडकल्याने हा अपघात झाला, ज्यामध्ये बागवाला पोलीस स्टेशन हद्दीतील अहमदपूर गावातील आकाश हा ठार झाला तर अन्य दोघे जखमी झाले.

Thane Election : जागावाटपावरून घमासान सुरूच! भाजपची स्वबळाची चाचपणी; भाजप-सेना बैठक झालीच नाही

BMC आयुक्त आणि MPCB सचिव 'हाजिर हो'! HC चा आदेश; हवा प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याचे म्हणत पालिकेला फटकारले

एकनाथ शिंदे मुंबईत १०० जागांवर ठाम; स्वतंत्र लढण्याचीही रणनीती; भाजपच्या ६० जागांच्या प्रस्तावास नकार

पुण्यात अजित पवारांची काँग्रेसशी ‘हात’मिळवणी? सतेज पाटलांना केला फोन; आघाडीविषयी दोन्ही नेत्यांमध्ये प्राथमिक बोलणीही झाली?

मुख्यमंत्रीपद कायमस्वरूपी नसते! भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा भाजप नेतृत्वाला घरचा आहेर