राष्ट्रीय

काश्मीरमधील चकमकीत ३ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील जंगलात जवळपास सहा तासांहून अधिक वेळ सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले.

Swapnil S

भगेरवाह/जम्मू : जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील जंगलात जवळपास सहा तासांहून अधिक वेळ सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. हे दहशतवादी पाकिस्तानस्थित ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे.

गंडोह परिसरातील बाजद गावात झालेल्या या चकमकीत एक पोलीस जखमी झाला आहे. दहशतवाद्यांनी ११ आणि १२ जून रोजी या डोंगराळ जिल्ह्यात दहशतवादी हल्ले केले होते. त्यानंतर पोलीस, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने संयुक्तपणे या परिसराला वेढा घालून शोधमोहीम हाती घेतली असता ही चकमक झडली.

दहशतवाद्यांनी केलेल्या दोन हल्ल्यांनंतर शोधमोहीम अधिक व्यापक करण्यात आली आणि पाकिस्तानच्या चार दहशतवाद्यांबाबतच्या माहितीसाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. हे दहशतवादी पाकमधून घुसखोरी करून दोडा जिल्ह्यात आल्याचा संशय आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक