राष्ट्रीय

१२ ऑक्टोबरपर्यंत देशात 5G सेवा सुरू होणार; दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

दूरसंचार कंपन्या या संदर्भात काम करत आहेत आणि तांत्रिक स्थापना केली जात आहे.

वृत्तसंस्था

केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, आम्ही देशात वेगाने 5G सेवा सुरू करण्याचा विचार करत आहोत. दूरसंचार कंपन्या या संदर्भात काम करत आहेत आणि तांत्रिक स्थापना केली जात आहे. १२ ऑक्टोबरपर्यंत देशात 5G सेवा सुरू होईल, अशी आशा केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर त्याचा विस्तार शहरे आणि गावांमध्ये केला जाईल.

तीन वर्षांत प्रत्येक भागात सेवा

वैष्णव म्हणाले, “आम्ही 5G येत्या दोन ते तीन वर्षांत देशाच्या प्रत्येक भागात पोहोचेल अशी अपेक्षा आहे. ते परवडणारे राहील याचीही आम्ही खात्री करू. 5G सेवांचा विस्तार करण्यासाठी दूरसंचार उद्योग शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांवर लक्ष केंद्रित करत आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला देखील केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितले होते की ऑक्टोबरपासून देशात 5G सेवा सुरू केली जाऊ शकते. त्यावेळी केंद्रीय मंत्री म्हणाले होते की, भारताची दूरसंचार बाजारपेठ ही जगातील सर्वात स्वस्त बाजारपेठ आहे. देशात 5G सेवेच्या किमतीही परवडणाऱ्या असतील, सर्वसामान्यांनाही 5G सेवेचा लाभ घेता येईल.

इलेक्ट्रो-मॅग्नेटिक रेडिएशनच्या नुकसानीच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले की, येथे रेडिएशनची पातळी अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत 10 पट कमी असेल, त्यामुळे येथे रेडिएशनचा धोका राहणार नाही.

पुण्यातील वरिष्ठ शास्त्रज्ञाला 'डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात ओढले; सायबर चोरट्यांनी तब्बल ७८ लाख रुपये लुटले

रायगडावर प्री-वेडिंग शूटमुळे वाद; शिवसमाधी परिसरातील व्हिडीओ व्हायरल

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी

IPL 2026 : चिन्नास्वामीत गोलंदाजांचा कस; बंगळुरू-लखनऊमध्ये आज लढत; फलंदाजांकडून धावांचा वर्षाव अपेक्षित

खरातशी कोणताही संबंध नाही; २८ दिवसांनंतर रुपाली चाकणकर यांचा खुलासा