राष्ट्रीय

४जी सेवेच्या तुलनेत ५जी सेवा महाग ठरणार; ग्राहकांना २० टक्क्यांपर्यत जास्तीचा खर्च करावा लागणार

सध्याच्या स्तरावर प्रति ग्राहक सरासरी कमाई (एआरपीयु) राखण्यासाठी, दर वाढवावे लागतील.

वृत्तसंस्था

४जी सेवेच्या तुलनेत ५जी सेवा महागडी ठरणार असून ही सेवा घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना २० टक्क्यांपर्यत जास्तीचा खर्च करावा लागू शकतो. ५जी सर्व्हिसेजसाठी टेलीकॉम ऑपरेटर सुरुवातीला ४जीच्या तुलनेत १०-२० टक्के जास्त दर आकारू शकतात, असे नोमुरा रिसर्चच्या एका अहवालात म्हटले आहे.

जपानच्या ब्रोकरेज फर्मनुसार, ५ जी सेवा सुरु झाल्यानंतर भारतीय टेलीकॉम ऑपरेटर्सला सध्याच्या स्तरावर प्रति ग्राहक सरासरी कमाई (एआरपीयु) राखण्यासाठी, दर वाढवावे लागतील. ५जी सर्व्हिसेज सी-बँड (३.३-३.६७ गीगा हर्ट्ज) एअरवेजवर ऑफर केले जातील. ४जीच्या तुलनेत १०पट जास्त स्पीडची ही सेवा शहरी भागाच्या श्रीमंत ग्राहकांना लक्ष्य करुन सुरू केली जाईल. नोमुराच्या अहवालामध्ये म्हटले आहे की, ‘टेलीकॉम ऑपरेटर सुरुवातीला ५जी सेवेत ग्राहकांच्या आवडीवर नजर ठेवतील. ते एआरपीयू वाढवण्याची पुढची पायरी म्हणून पाहतील. महागड्या स्पेक्ट्रमची किंमत शोधणे हे त्यांचे पहिले प्राधान्य असेल. मात्र त्यासाठी वेळ लागेल. एका अन्य ग्लोबल ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टनुसार, सुरुवातीला भारतात ५जी सेवा २० टक्क्यांपर्यंत महाग होईल. शहरी ग्राहकांसाठी असेल आणि जे महागडे ५जी हँडसेट विकत घेण्यासाठी तयार असतील.भारती एअरटेलच्या मते, ५जी सेवा सुरू झाल्यानंतर एआरपीयू २०० रुपयांपर्यंत वाढवावा लागेल.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन