राष्ट्रीय

उज्ज्वला योजनेचे ९० लाख लाभार्थी तुटले सिलिंडर पुन्हा भरलेच नाहीत

वृत्तसंस्था

पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत एलपीजी सिलिंडर घेणाऱ्या ९० लाख लाभार्थींनी पुन्हा सिलिंडर भरलेच नाहीत, अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तर या योजनेच्या एक कोटी लाभार्थींनी कनेक्शन घेतल्यानंतर वर्षात एकदाच सिलिंडर भरले आहे.

आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी इंडियन ऑईल, बीपीसीएल व एचपीसीएल आदी कंपन्यांना

माहिती अधिकारात प्रश्न विचारले हेाते. उज्ज्वला योजना पंतप्रधान मोदी यांनी १ मे २०१६ रोजी बलिया येथे सुरू केली. २०२० पर्यंत ८ कोटी एलपीजी देण्याचे लक्ष्य ठरवले होते. सरकारने ९ कोटी कनेक्शन दिले.

२०२१-२२ मध्ये उज्ज्वला योजना २.० सुरू केली. इंडियन ऑईलने सांगितले की, ६५ लाख ग्राहकांनी त्यांचे सिलिंडर गेल्या वर्षभरात भरले नाहीत. तर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या ९.१ लाख तर भारत पेट्रोलियमच्या १५.९६ लाख ग्राहकांनी सिलिंडर भरले नाहीत. भारत पेट्रोलियमने सांगितले की, हा आकडा सप्टेंबर २०१९ पर्यंत उज्ज्वला योजनेच्या पहिल्या टप्प्यातील आहे.

गेल्या आर्थिक वर्षात इंडियन ऑईलच्या ५२ लाख ग्राहकांनी एक वर्षात एकदाच, एचपीसीएलच्या २७.५८ लाख तर बीपीसीएलच्या २८.५६ लाख ग्राहकांनी एकदाच सिलिंडर भरला आहे.

Union Budget 2026 Live : मुंबई-पुणे प्रवास होणार सुसाट; देशात ७ हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर; अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा एकाच क्लिकवर

Union Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्प आज होणार सादर; निर्मला सीतारामन कोणत्या मोठ्या घोषणा करणार?

राष्ट्रवादी विलीनीकरण अखेर अधांतरीच! प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंच्या खेळीने पवार कुटुंबातील फूट अधोरेखित

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत संभ्रम; पार्थ पवारांनी घेतली शरद पवारांची भेट

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री; महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा बहुमान