राष्ट्रीय

उज्ज्वला योजनेचे ९० लाख लाभार्थी तुटले सिलिंडर पुन्हा भरलेच नाहीत

वृत्तसंस्था

पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत एलपीजी सिलिंडर घेणाऱ्या ९० लाख लाभार्थींनी पुन्हा सिलिंडर भरलेच नाहीत, अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तर या योजनेच्या एक कोटी लाभार्थींनी कनेक्शन घेतल्यानंतर वर्षात एकदाच सिलिंडर भरले आहे.

आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी इंडियन ऑईल, बीपीसीएल व एचपीसीएल आदी कंपन्यांना

माहिती अधिकारात प्रश्न विचारले हेाते. उज्ज्वला योजना पंतप्रधान मोदी यांनी १ मे २०१६ रोजी बलिया येथे सुरू केली. २०२० पर्यंत ८ कोटी एलपीजी देण्याचे लक्ष्य ठरवले होते. सरकारने ९ कोटी कनेक्शन दिले.

२०२१-२२ मध्ये उज्ज्वला योजना २.० सुरू केली. इंडियन ऑईलने सांगितले की, ६५ लाख ग्राहकांनी त्यांचे सिलिंडर गेल्या वर्षभरात भरले नाहीत. तर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या ९.१ लाख तर भारत पेट्रोलियमच्या १५.९६ लाख ग्राहकांनी सिलिंडर भरले नाहीत. भारत पेट्रोलियमने सांगितले की, हा आकडा सप्टेंबर २०१९ पर्यंत उज्ज्वला योजनेच्या पहिल्या टप्प्यातील आहे.

गेल्या आर्थिक वर्षात इंडियन ऑईलच्या ५२ लाख ग्राहकांनी एक वर्षात एकदाच, एचपीसीएलच्या २७.५८ लाख तर बीपीसीएलच्या २८.५६ लाख ग्राहकांनी एकदाच सिलिंडर भरला आहे.

THANE : रामनवमीनिमित्त ट्रॅफिक निर्बंध; वागळे परिसरातील अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Ram Navami 2026 : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मुंबईत २००० ड्रोनचा भव्य शो; काय असणार खास? जाणून घ्या वेळ आणि स्थळ

केंद्र सरकारचा निर्णय; घरात PNG असेल तर LPG पुरवठा बंद, गॅस कनेक्शनवर नवे नियम लागू

Mumbai : ८७० रुपयांच्या वादातून संतापजनक प्रकार; ओशिवरामध्ये सिगारेट विक्रेत्याला कारने फरफटत नेले, घटना CCTV मध्ये कैद

मुंबईकरांना दिलासा; मेट्रो 2Bमुळे चेंबूर परिसरातील प्रवास होणार जलद