राष्ट्रीय

मणिपूरमध्ये ९६ मृतदेह बेवारस

हिंसाचारात ४७८६ घर, ३८६ धार्मिक स्थळांचे नुकसान झाले

नवशक्ती Web Desk

इंफाळ : मणिपूरमध्ये गेल्या चार महिन्यात सुरू असलेल्या हिंसाचारात १७५ जणांचा बळी गेला आहे. त्यातील ९६ मृतदेह बेवारस आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

इंफाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस महानिरीक्षक आय. के. मुईवा, पोलीस महानिरीक्षक जयंत कुमार (ॲॅडमिन), निशित उज्ज्वल (गुप्तचर) हे उपस्थित होते.

मणिपूरच्या हिंसाचारात १११८ जण जखमी झाले. त्यातील ३३ जण बेपत्ता आहेत. चार महिने सुरू असलेल्या हिंसाचारात ४७८६ घर, ३८६ धार्मिक स्थळांचे नुकसान झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Mumbai : पाणी टँकरचालकांचा उद्यापासून संप; बडे टॉवर, कार्यालये यांना फटका बसण्याची भीती

खिशाला कात्री! केस कापण्यापासून दाढीपर्यंत सर्व महागले; नवे दर जाणून घ्या

Navi Mumbai : "कित्येक रात्री झोपलेच नाही" म्हणत महिलेचा उद्रेक; रात्रीच्या वीजखंडितीने नागरिक त्रस्त, Video

स्वयंपाकाचा गॅस पुन्हा महागला; सिलिंडरच्या किंमतीत २९ रुपयांची वाढ, तुमच्या शहरातील दर किती?

MPSC च्या गुणवंताना खासगी नोकरीची संधी; UPSC च्या धर्तीवर निर्णय