राष्ट्रीय

लखनौमधील यमुनेत 50 जणांची नाव उलटून अपघात, 4 मृतदेह सापडले, अनेकजण बेपत्ता

रक्षाबंधनासाठी भावांकडे निघालेल्या 20 ते 25 बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती नुकतीच समोर येत आहे. बांद्याहून फतेहपूरला जाणारी बोट यमुनेत उलटल्याने हा अपघात

वृत्तसंस्था

रक्षाबंधनासाठी भावांकडे निघालेल्या 20 ते 25 बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती नुकतीच समोर येत आहे. बांद्याहून फतेहपूरला जाणारी बोट यमुनेत उलटल्याने हा अपघात झाला. या बोटीत लहान मुलांसह 20 ते 25 महिला प्रवास करत असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले. पाणबुड्यांद्वारे बुडालेल्यांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 25 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे.

नदीच्या मधोमध आल्यावर बोट हेलकावे घ्यायला लागल्याने बोटीतील लोक घाबरून बोटीत इकडे तिकडे जाऊ लागले. यामध्ये एका बाजूला लोकांची संख्या वाढली आणि बोट उलटी झाली. या अपघातात महिला आणि लहान मुले बुडाली असून दरम्यान, तेथून जाणाऱ्या काही नावांनी बुडालेल्या लोकांना वाचवण्यास सुरुवात केली. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, बोटीवर 40 ते 50 लोक होते. त्यातील 15 जणांना वाचवण्यात यश आले तर 25 ते 30 जण वाहून गेले.

५० हजारांवरील व्याजावर TDS कपात; ज्येष्ठ नागरिकांसाठी १ लाखपर्यंत सवलत

Mumbai : 'मेट्रो वुमन' अश्विनी भिडे बनल्या पहिल्या महिला BMCआयुक्त; आज पदभार स्वीकारणार

"लोक एकमेकांवर पडत होते..." बिहारमध्ये शीतला मंदिरात भीषण चेंगराचेंगरी; ८ महिलांचा मृत्यू, अनेक जखमी; Video

'रेडी रेकनर' दरवाढ माफक राहणार?­ महागाई व जागतिक अनिश्चिततेचा परिणाम

Bigg Boss Marathi 6 : ‘घटस्फोटाचा मुद्दा काढत मर्यादा ओलांडल्या...राकेश-विशालच्या हाणामारीवर बापट कुटुंबीयांचा संताप; कारवाईची मागणी