राष्ट्रीय

मोदी-जिनपिंग भेटीवरून आरोप-प्रत्यारोप

भारताने चीनचा दावा फेटाळत चीननेच यापूर्वी भेटीसाठी विनंती केल्याचे म्हटले आहे

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे नुकत्याच पार पडलेल्या ब्रिक्स संघटनेच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी चालता-चालता काही क्षण बोलणी केली. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. या भेटीसाठी भारताने मागणी केली होती, असे चीनने म्हटले आहे. तर भारताने चीनचा दावा फेटाळत चीननेच यापूर्वी भेटीसाठी विनंती केल्याचे म्हटले आहे.

चीनने २०२० साली लडाखमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यापासून दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहेत. त्यानंतर दोन्ही देशांचे नेते काही आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये एका मंचावर आले. पण त्यांनी थेट समोरासमोर येऊन बोलणे टाळले होते. लडाखमधील चीनच्या घुसखोरीप्रश्नी दोन्ही देशांच्या लष्कराच्या कोअर कमांडर पातळीवरील चर्चेची १९वी फेरी नुकतीच पार पडली. तसेच सप्टेंबरमध्ये नवी दिल्लीत होणाऱ्या जी-२० परिषदेला जिनपिंग उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिक्स बैठकीवेळी मोदी आणि जिनपिंग यांनी काही वेळ चालता-चालता बोलणी केली. त्यात त्यांनी लडाखमधील परिस्थितीवर ओझरती चर्चा केल्याचे वृत्त आहे.

या अल्पशा भेटीवरून आता मोठेपणाचा वाद रंगला आहे. या भेटीसाठी भारतानेच विनंती केल्याचा दावा चीनने केला आहे, तर भारताना तो दावा फेटाळला असून चीनकडून भेटीसाठी आलेली विनंती प्रलंबित होती. त्यामुळे चर्चा झाली, असा खुलासा केला आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत