राष्ट्रीय

अमित शहांना इतिहास माहीत नाही, ते पुनर्लेखन करतात ;नेहरूंवरील टीकेवरून राहुल यांचे गृहमंत्र्यांना प्रत्युत्तर

शहा यांनी काश्मीर समस्येसाठी नेहरूंवर दोषारोप केला आणि अवेळी युद्धविराम देण्याच्या चुकांकडे लक्ष वेधले

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली  : गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावरील जोरदार टीकेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी शहा यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. शहा यांना इतिहास माहीत नाही आणि ते पुनर्लेखन करत आहेत, असे राहुल गांधी यांनी सांगितले. गांधी म्हणाले की, हे संपूर्ण प्रकरण जात जनगणनेच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करणे आणि देशाचा पैसा कोणाच्या हातात जात आहे यावरून लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी आहे.

 सोमवारी राज्यसभेत बोलताना शहा यांनी काश्मीर समस्येसाठी नेहरूंवर दोषारोप केला आणि अवेळी युद्धविराम देण्याच्या चुकांकडे लक्ष वेधले आणि नेहरू यांनी हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेला, त्यावरून त्यांनी टीका केली होती.

शहा यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता गांधी म्हणाले, "पंडित नेहरूंनी आपले जीवन या देशासाठी समर्पित केले. ते वर्षानुवर्षे तुरुंगात होते, अमित शहा यांना कदाचित इतिहास माहीत नसेल. ते इतिहासाचे पुनर्लेखन करत असल्याने त्यांना इतिहास माहीत असेल अशी मला अपेक्षा नाही. हे सर्व विचलित करण्याबद्दल आहे, मूळ मुद्दा जात जनगणना आणि सहभागाचा आहे, देशाचा पैसा कोणाच्या हातात जात आहे त्याचा आहे, मात्र त्यांना या विषयावर चर्चा करायची नाही, ते घाबरतात आणि यापासून पळून जातात,'' असे राहुल गांधी यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले. काँग्रेस हा मुद्दा पुढे करेल आणि गरीबांना त्यांचे हक्क मिळवून देतील, असे ते म्हणाले.

छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजपने आदिवासी आणि ओबीसींना मुख्यमंत्री बनवण्याबाबत विचारले असता गांधी म्हणाले, आमचेही ओबीसी होते (छत्तीसगडमध्ये सीएम), त्यांनी ओबीसी (मध्य प्रदेशात सीएम देखील केले आहे) हा मुद्दा नाही, प्रश्न आहे. संरचनेत (ओबीसींचा) सहभाग काय आहे. पंतप्रधान (नरेंद्र मोदी) हे ओबीसी आहेत, पण सरकार ९० अधिकाऱ्यांद्वारे चालवले जाते. ९० अधिकाऱ्यांपैकी तीन ओबीसी आहेत आणि त्यांचे कार्यालय कोपऱ्यात आहे. माझा मुद्दा हा आहे की, संस्थात्मक व्यवस्थेत ओबीसींचा सहभाग काय आहे. दलित, आदिवासींचा सहभाग काय, हा देशापुढील मुख्य प्रश्न आहे, असे ते म्हणाले.

Dharmendra Death: बॉलिवूडचा 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचे निधन, सनी देओलकडून मुखाग्नी; मनोरंजन विश्वात शोककळा

CJI Surya Kant Oath : न्या. सूर्य कांत बनले भारताचे ५३ वे सरन्यायाधीश; राष्ट्रपती मुर्मू यांनी दिली शपथ; ७ देशांचे मुख्य न्यायाधीश हजर

पंकजा मुंडे यांचे स्टेटमेंट वाचून धक्का बसला : अंजली दमानिया; गौरी गर्जे प्रकरणात उपस्थित केले गंभीर सवाल

Ram Mandir Flag Hoisting: ध्वजारोहणासाठी अयोध्या नगरी सजली, कडक सुरक्षा तैनात; उद्या होणाऱ्या कार्यक्रमात मोबाईल बंदी

रायगडच्या दहा नगरपालिकांमध्ये ‘लेकी-सुनां’ची एन्ट्री, राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी जोरदार तयारी