राष्ट्रीय

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सामान्य मान्सून अल-निनोचा प्रभाव नाही

देशात आतापर्यंत ४६७ मिमी पाऊस झाला आहे. ४४५.८ मिमी पाऊस झाल्यास तो सामान्य पाऊस समजला जातो

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : यंदा अल-निनोचा प्रभाव राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. तो दूर सारत यंदा मान्सूनने जुलैमध्ये तुफान फटकेबाजी केली. पहिल्या इनिंगमध्ये पाऊस १३ टक्के जादा बरसला आहे, तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाऊस सामान्य राहणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा म्हणाले की, मध्य भारत, पूर्व भारताचा काही भाग, ईशान्य भारतात व हिमालयाच्या जवळील काही उपविभागात पाऊस सामान्यापेक्षा जास्त झाला आहे, तर ईशान्य भारताच्या काही भागात मान्सून कमी झाला.

भारतात जुलैमध्ये १३ टक्के अधिक पाऊस झाला, तर पूर्व व ईशान्य भागात १९०१ नंतर तिसऱ्यांदा कमी पाऊस झाला आहे.

वायव्य भारतात २५८.६ मिमी पाऊस झाला आहे. जुलै २००१ पासून हे प्रमाण सर्वाधिक आहे. जूनमध्ये भारतात पावसाची तूट ९ टक्के होती, तर जुलैमध्ये तो १३ टक्के अधिक पडला.

देशात आतापर्यंत ४६७ मिमी पाऊस झाला आहे. ४४५.८ मिमी पाऊस झाल्यास तो सामान्य पाऊस समजला जातो. दक्षिण अमेरिकेजवळील प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या ‘अल-निनो’चा प्रभाव अद्यापि पावसावर झालेला नाही, असे मोहपात्रा म्हणाले.

पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान; मोदी म्हणाले, "हा सन्मान भारताच्या...

मोठी बातमी! अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती

मनरेगाचे नाव इतिहासजमा; VB-G RAM G विधेयक मंजूर, प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल, "हे सर्व गरिबांच्या...

BMC Election : महायुतीतून अजित दादांची NCP आउट, भाजप-शिवसेनेचं १५० जागांवर ठरलं; अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या - 'राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या...