राष्ट्रीय

धर्मसंसदेच्या मेळाव्यात द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी जितेंद्र त्यागीला जामीन मंजूर

वृत्तसंस्था

डेहराडूनला झालेल्या धर्मसंसदेच्या मेळाव्यात द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी अटक केलेल्या वसीम रिझवी उर्फ ​​जितेंद्र त्यागीला मंगळवारी सुप्रीम कोर्टाने जामीन दिला. १३ जानेवारी रोजी उत्तराखंड पोलिसांनी हरिद्वार येथे त्यागीला अटक केली होती. १७ ते १९ डिसेंबरदरम्यान झालेल्या धर्मसंसदेच्या मेळाव्यात द्वेषपूर्ण भाषण केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती.

त्यागी आणि इतरांविरुद्ध ज्वालापूर हरिद्वार येथील रहिवासी नदीम अली यांच्या तक्रारीवरून २ जानेवारी २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना कलम १५३अ (धर्म, वंश, स्थानाच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) अंतर्गत १३ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. भारतीय दंड संहिता आणि कलम २९८ (कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने शब्द उच्चारणे) अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मागील सुनावणीच्या तारखेला सुप्रीम कोर्टाने त्याच्या जामीन याचिकेवर राज्य सरकारचा जबाब मागवला होता. मंगळवारी, राज्याने न्यायालयाला सांगितले की, जातीय सलोखा कोणत्याही परिस्थितीत राखला गेला पाहिजे आणि त्यागी यांना कोणतीही चिथावणीखोर विधाने न करण्याची अट घातली आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत