राष्ट्रीय

धर्मसंसदेच्या मेळाव्यात द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी जितेंद्र त्यागीला जामीन मंजूर

वृत्तसंस्था

डेहराडूनला झालेल्या धर्मसंसदेच्या मेळाव्यात द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी अटक केलेल्या वसीम रिझवी उर्फ ​​जितेंद्र त्यागीला मंगळवारी सुप्रीम कोर्टाने जामीन दिला. १३ जानेवारी रोजी उत्तराखंड पोलिसांनी हरिद्वार येथे त्यागीला अटक केली होती. १७ ते १९ डिसेंबरदरम्यान झालेल्या धर्मसंसदेच्या मेळाव्यात द्वेषपूर्ण भाषण केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती.

त्यागी आणि इतरांविरुद्ध ज्वालापूर हरिद्वार येथील रहिवासी नदीम अली यांच्या तक्रारीवरून २ जानेवारी २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना कलम १५३अ (धर्म, वंश, स्थानाच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) अंतर्गत १३ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. भारतीय दंड संहिता आणि कलम २९८ (कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने शब्द उच्चारणे) अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मागील सुनावणीच्या तारखेला सुप्रीम कोर्टाने त्याच्या जामीन याचिकेवर राज्य सरकारचा जबाब मागवला होता. मंगळवारी, राज्याने न्यायालयाला सांगितले की, जातीय सलोखा कोणत्याही परिस्थितीत राखला गेला पाहिजे आणि त्यागी यांना कोणतीही चिथावणीखोर विधाने न करण्याची अट घातली आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान; कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

स्मोकर्सना झटका! टॅक्स वाढल्याने Gold Flake पासून Classic Connect च्या सिगारेट दरांत प्रचंड वाढ; 'धूम्रपान सोडा किंवा जास्त पैसे मोजा'

Pune Porsche Case : रक्तनमुने बदलल्याच्या कटातील तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार; ICC ने घेतली गंभीर दखल, पाक सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत PCB ला दिली वॉर्निंग

BMC Mayor : महायुतीत निवडणूक लढली, पण नोंदणी वेगळी; आज कोकण भवनात भाजप आणि शिंदे सेना 'स्वतंत्र' गटनोंदणी करणार