राष्ट्रीय

भारतासोबत संबंधात बांगलादेशचे हित महत्त्वाचे - तारिक रेहमान

भारतासोबतच्या संबंधात आम्ही बांगलादेशच्या हितांना सर्वोच्च प्राधान्य देऊ, असे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) अध्यक्ष तारिक रेहमान यांनी शनिवारी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधताना नमूद केले.

Swapnil S

ढाका: भारतासोबतच्या संबंधात आम्ही बांगलादेशच्या हितांना सर्वोच्च प्राधान्य देऊ, असे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) अध्यक्ष तारिक रेहमान यांनी शनिवारी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधताना नमूद केले.

बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीतील विजयानंतर तारिक रेहमान यांनी देशवासीयांना एकजूट राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, मार्ग आणि विचार भिन्न असू शकतात, परंतु देशाच्या हितासाठी सर्वांना एकत्र राहावे लागेल. त्यांच्या मते, राष्ट्रीय एकता हीच देशाची ताकद आहे आणि फूट ही कमजोरी आहे.

आजपासून देशात खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आणि अधिकार पुनर्संचयित झाले आहेत. त्यांनी बांगलादेशच्या जनतेचे अभिनंदन करत म्हटले की, लोकांनी सर्व अडचणींवर मात करून देशात लोकशाहीचा मार्ग तयार केला आहे.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार