राष्ट्रीय

भारतासोबत संबंधात बांगलादेशचे हित महत्त्वाचे - तारिक रेहमान

भारतासोबतच्या संबंधात आम्ही बांगलादेशच्या हितांना सर्वोच्च प्राधान्य देऊ, असे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) अध्यक्ष तारिक रेहमान यांनी शनिवारी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधताना नमूद केले.

Swapnil S

ढाका: भारतासोबतच्या संबंधात आम्ही बांगलादेशच्या हितांना सर्वोच्च प्राधान्य देऊ, असे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) अध्यक्ष तारिक रेहमान यांनी शनिवारी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधताना नमूद केले.

बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीतील विजयानंतर तारिक रेहमान यांनी देशवासीयांना एकजूट राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, मार्ग आणि विचार भिन्न असू शकतात, परंतु देशाच्या हितासाठी सर्वांना एकत्र राहावे लागेल. त्यांच्या मते, राष्ट्रीय एकता हीच देशाची ताकद आहे आणि फूट ही कमजोरी आहे.

आजपासून देशात खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आणि अधिकार पुनर्संचयित झाले आहेत. त्यांनी बांगलादेशच्या जनतेचे अभिनंदन करत म्हटले की, लोकांनी सर्व अडचणींवर मात करून देशात लोकशाहीचा मार्ग तयार केला आहे.

TCS प्रकरणात दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम चौकशीसाठी नाशिकमध्ये; १५० कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे निर्देश

गोरेगावमधील मोतीलालनगर पुनर्विकासाचा मास्टर प्लान लवकरच; उच्च दर्जाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार

VIDEO : लखनऊमधील झोपडपट्टीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांमुळे शेकडो झोपड्या जळून खाक, अनेक कुटुंबे बेघर

Mumbai : परळ स्थानकाचे पुन्हा नूतनीकरण; विस्तारीकरणासाठी नव्या बांधकामावर हातोडा?

Bigg Boss Marathi 6: पहिली फायनलिस्ट तन्वी कोलते अडचणीत? 'त्या' वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संताप, विजेतेपदाच्या चर्चेला नवं वळण