चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीचे संग्रहित छायाचित्र फोटो - पीटीआय
राष्ट्रीय

Bengaluru Stampede: चेंगराचेंगरीप्रकरणी कर्नाटक सरकारने RCB आणि BCCI वर फोडले खापर

या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती आणि आयोजकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अख्ख्या जगाला कार्यक्रमासाठी बोलावले, असे सरकारने उच्च न्यायालयात सांगितले.

Swapnil S

बंगळुरू : तब्बल १८ वर्षांनंतर आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर निघालेल्या विजयी रॅलीत बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीसाठी कर्नाटक सरकारने ‘आरसीबी’ आणि ‘बीसीसीआय’वर खापर फोडले आहे.

या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती आणि आयोजकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अख्ख्या जगाला कार्यक्रमासाठी बोलावले, असे सरकारने उच्च न्यायालयात सांगितले.

राज्य सरकारची बाजू मांडताना ॲॅडव्होकेट जनरल शशी किरण शेट्टी यांनी हायकोर्टाला सांगितले की, “आरसीबीने त्यांच्या भागीदारांविरुद्ध अनेक आरोप केले आहेत. राज्य सरकारने या घटनेसाठी ‘बीसीसीआय’ जबाबदार असल्याचा आरोप केला. या विजयोत्सव मिरवणुकीसाठी सुरक्षा, प्रवेशद्वार आणि तिकीट व्यवस्थापनाबाबत आरसीबी आणि बीसीसीआय यांच्यात करार झाला होता. असे वाटत होते जसे की त्यांनी संपूर्ण जगाला आमंत्रित केले आहे.”

Iran vs US-Israel War : ट्रम्प यांचा पुन्हा 'हल्लाबोल'; लवकर शांतता तह करा, अन्यथा, 'उद्ध्वस्त' करू- इराणला इशारा

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी सरी; पुणे, पिंपरी - चिंचवड, वाशिममध्ये पाऊस; वातावरणात गारवा, पण शेतीचे नुकसान

संभाजीनगरात LPG टंचाई; दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा संप; प्रवाशांचे हाल

नक्षलवाद संपवण्यासाठी काँग्रेसने काहीच केले नाही; नक्षलींना गोळीला गोळीनेच उत्तर देऊ; लोकसभेत शहा यांचा प्रहार

भारतात येणाऱ्या इराणच्या विमानावर अमेरिकेचा हल्ला