चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीचे संग्रहित छायाचित्र फोटो - पीटीआय
राष्ट्रीय

Bengaluru Stampede: चेंगराचेंगरीप्रकरणी कर्नाटक सरकारने RCB आणि BCCI वर फोडले खापर

या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती आणि आयोजकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अख्ख्या जगाला कार्यक्रमासाठी बोलावले, असे सरकारने उच्च न्यायालयात सांगितले.

Swapnil S

बंगळुरू : तब्बल १८ वर्षांनंतर आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर निघालेल्या विजयी रॅलीत बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीसाठी कर्नाटक सरकारने ‘आरसीबी’ आणि ‘बीसीसीआय’वर खापर फोडले आहे.

या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती आणि आयोजकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अख्ख्या जगाला कार्यक्रमासाठी बोलावले, असे सरकारने उच्च न्यायालयात सांगितले.

राज्य सरकारची बाजू मांडताना ॲॅडव्होकेट जनरल शशी किरण शेट्टी यांनी हायकोर्टाला सांगितले की, “आरसीबीने त्यांच्या भागीदारांविरुद्ध अनेक आरोप केले आहेत. राज्य सरकारने या घटनेसाठी ‘बीसीसीआय’ जबाबदार असल्याचा आरोप केला. या विजयोत्सव मिरवणुकीसाठी सुरक्षा, प्रवेशद्वार आणि तिकीट व्यवस्थापनाबाबत आरसीबी आणि बीसीसीआय यांच्यात करार झाला होता. असे वाटत होते जसे की त्यांनी संपूर्ण जगाला आमंत्रित केले आहे.”

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video