राष्ट्रीय

बिहारमध्ये मतदार यादीतून ३५ लाख नावे हटवणार; EC चा निर्णय, राजकीय संघर्ष पेटणार

निवडणूक आयोगाने बिहारच्या मतदार यादीतून सखोल पुनर्विलोकलन केल्यानंतर ३५ लाख मतदारांची नावे हटवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Swapnil S

पाटणा : निवडणूक आयोगाने बिहारच्या मतदार यादीतून सखोल पुनर्विलोकलन केल्यानंतर ३५ लाख मतदारांची नावे हटवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

आयोगाने सांगितले की, राज्यातील बहुतांशी मतदारांशी थेट संपर्क करून त्यांच्याकडे ‘ईएफ’ फॉर्म पाठवला आहे. ८८.६६ टक्के मतदारांनी आपला फॉर्म जमा केला आहे. या प्रक्रियेनंतर ३५ लाखाहून अधिक मतदारांचे नाव मतदार यादीतून बाहेर काढले जाणार आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, बिहारच्या ६.६ कोटी मतदारांनी आपला फॉर्म जमा केला आहे. हे प्रमाण राज्याच्या एकूण मतदारांच्या ८८.१८ टक्के आहे. मतदारांना आपला फॉर्म जमा करण्याची तारीख २५ जुलै आहे. त्यानंतर मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, आतापर्यंत मतदार यादीतील १२.५ लाख मतदारांचा मृत्यू झाला आहे. तरीही त्यांचे नाव मतदार यादीत आहेत. तर १७.५ लाख मतदार कायमस्वरुपी बिहारच्या बाहेर गेले आहेत. आता ते राज्यात मतदान करू शकत नाहीत. तर ५.५ लाख मतदारांची यादीत दोनदा नावे आहे. त्यामुळे ३५.५ लाख मतदारांची नावे मतदार यादीतून हटणार आहेत.

बिहारमधील मतदार यादीत नेपाळ, बांगलादेश आणि मान्यमार येथील काही परदेशी नागरिकांची नावे आढळली. त्यानंतर ही नावे हटवण्यात येणार आहेत.

भाडेकरुने घरमालकाची शांतता भंग करणे हा ‘उपद्रव’; HC चे महत्त्वपूर्ण निरीक्षण, पुण्याच्या बुधवार पेठेत लॉज चालवणाऱ्याला दणका

मुलाच्या आयुष्यात आई-वडील दोघेही महत्त्वाचे; उच्च न्यायालयाचा निर्वाळा; याचिकाकर्त्या महिलेला झटका

सोन्या-चांदीवरील आयात शुल्क दुप्पट; रुपया सावरण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नीट पेपरफुटीः पुण्यातून महिलेसह पाच ताब्यात; कोचिंग क्लासेस, डॉक्टर्स यांचाही सहभाग?

आता ‘वर्षा’वरही CCTV यंत्रणा; राज्यातील पहिलेच शासकीय निवासस्थान