(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

राज्यसभेच्या ५६ पैकी ३० जागा भाजपला, बहुमतापासून ४ जागा दूर

Swapnil S

नवी दिल्ली : राज्यसभेतील ५६ रिक्त जागांसाठी मंगळवारी झालेल्या मतदानाचे निकाल हाती आले असून त्यानुसार ३० जागांवर भारतीय जनता पक्षाचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील बहुमतापासून केवळ ४ जागा दूर राहिली आहे.

राज्यसभेच्या एकूण २४० जागांपैकी ५६ जागा यंदा रिक्त झाल्या होत्या. त्यासाठी मंगळवारी (२७ फेब्रुवारी) मतदान पार पडले. त्याचा निकाल हाती आला असून त्यात ५६ पैकी ३० जागा भाजपने जिंकल्या आहेत. भाजपने जिंकलेल्या ३० जागांपैकी २० जागांवरील उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती आणि १० जागांवर भाजपच्या उमेदवारांचा मतदानानंतर विजय झाला आहे. त्यामुळे आता राज्यसभेत केवळ भाजपचे ९७ सदस्य झाले आहेत. तर भाजपप्रणीत एनडीएचे ११७ सदस्य झाले आहेत. राज्यसभेत बहुमत असण्यासाठी २४० पैकी १२१ जागा मिळणे आवश्यक आहे. आता एनडीए त्या आकड्यापासून केवळ ४ जागा दूर राहिली आहे.

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

काय सांगता? एप्रिलमध्ये तब्बल ३ लाख लोकांनी खरेदी केली 'ही' बाईक, पाहा लिस्ट

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व