राष्ट्रीय

भाजप सत्तेत आल्यास कल्याणकारी योजना बंद करेल -राहुल गांधी

नवशक्ती Web Desk

जयपूर : काँग्रेस सरकारने राजस्थानमध्ये ज्या कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, त्या भाजप सत्तेवर आल्यास थांबवील, भाजप लक्षाधीशांना मदत करेल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चुरू जिल्ह्यातील तारानगर येथील एका प्रचारसभेत बोलताना सांगितले.

काँग्रेसने सुरू केलेल्या पेन्शन योजना, आरोग्य विमा योजना, सवलतीमधील गॅस सिलिंडर, महिलांना वार्षिक १० हजार रुपयांचे सहाय्य हे सर्व भाजप सत्तेवर आल्यास थांबवेल आणि पुन्हा ते श्रीमंतांना मदत करेल, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हमी’वरही त्यांनी ताशेरे ओढले. मोदींची हमी म्हणजे अदानींसाठी हमी, तर काँग्रेस म्हणजे शेतकरी, मजूर आणि तरुणांचे सरकार. हा फरक आहे. तुम्हीच ठरवायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त