ममता बॅनर्जी  संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

बांगलादेशातील घुसखोरांना BSF ची मदत; ममता बॅनर्जींचा आरोप

पश्चिम बंगालला अस्थिर करण्यासाठी सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) बांगलादेशातील घुसखोरांना पश्चिम बंगालमध्ये घुसण्यास मदत करीत असल्याचा आरोप राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी केला.

Swapnil S

कोलकाता : पश्चिम बंगालला अस्थिर करण्यासाठी सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) बांगलादेशातील घुसखोरांना पश्चिम बंगालमध्ये घुसण्यास मदत करीत असल्याचा आरोप राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी केला. बीएसएफची ही वृत्ती म्हणजे केंद्र सरकारची रूपरेषा असल्याचे स्पष्टपणे जाणवते, असेही बॅनर्जी म्हणाले.

इस्लामपूर, सीताई, चोप्रा आणि अन्य सीमाभागांमधून बीएसएफ घुसखोरांना भारतीय हद्दीत येऊ देत असल्याची आमच्याकडे माहिती आहे. इतकेच नव्हे, तर बीएसएफ जनतेचा छळ करीत असून राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही बॅनर्जी यांनी राज्याच्या मुख्यालयात घेतलेल्या प्रशासकीय आढावा बैठकीत सांगितले.

या सर्व प्रकाराचा बोलविता धनी केंद्र सरकार आहे, परंतु सीमेच्या दोन्ही बाजूला आम्हाला शांतता हवी आहे, आमचे बांगलादेशशी चांगले संबंध आहेत. बांगलादेशी घुसखोरांचे वास्तव्य कुठे आहे त्याचा ठावठिकाणा शोधून काढण्याचे आदेश ममता यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

बीएसएफ यासाठी राज्य सरकारला दोष देऊ पाहात आहे. त्यामुळे घुसखोरी केल्यानंतर हे घुसखोर कुठे वास्तव्य करीत आहेत त्याचा शोध घेण्यास सांगण्यात आले असून याबाबत आपण केंद्र सरकारला खरमरीत पत्र लिहिणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या.

Bihar : श्रावणी सोमवारी मोठी दुर्घटना! अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी; ७ महिला भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी; VIDEO

Mumbai : बाप्पाच्या विसर्जनापूर्वी खड्डेमुक्त रस्ते होणार; महापौरांचे समन्वय समितीला आश्वासन

वाहतूककोंडीवर ‘स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट’चा पायलट प्रोजेक्ट; गुगल मॅप्सवर कोंडी दिसताच उल्हासनगर वाहतूक पोलिसांची घटनास्थळी धाव

वसईत आजपासून तीन वाढीव न्यायालये कार्यान्वित; आणखी पाच-सहा कंटेनर कोर्ट सुरू करण्यासाठी प्रयत्न

दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये नेणार; मंत्री आशिष शेलार यांची घोषणा