राष्ट्रीय

नायजरमधून तत्काळ बाहेर पडा केंद्र सरकारचे भारतीयांना आवाहन

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : आफ्रिकेतील बंडाळीग्रस्त नायजर या देशातून भारतीय नागरिकांनी ताबडतोब बाहेर पडावे, असे आवाहन केंद्र सरकारने शुक्रवारी केले आहे.

नायजरमध्ये २६ जुलै रोजी झालेल्या लष्करी बंडात जनरल अब्दुलरहमान चियानी यांनी लोकनियुक्त अध्यक्ष मोहम्मद बझुम यांची सत्ता उलथून टाकली होती. तेव्हापासून तेथील परिस्थिती अत्यंत संवेदनशील असून, विविध देशांचे नागरिक तेथून बाहेर पडत आहेत. सध्या नायजरमध्ये साधारण २५० भारतीय नागरिक आहेत. त्यांनी ताबडतोब नायजरमधून बाहेर पडावे, असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी हा संदेश प्रसारित केला आहे. मदतीसाठी नायजरची राजधानी नियामे येथील भारतीय वकिलातीत +२२७ ९९७५ ९९७५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त