राष्ट्रीय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पवारांना सोडायला तयार नाही-गुलाबराव पाटील

गुवाहाटीवरून निघण्याआधी बंडखोरांची बैठक झाली. त्या बैठकीत गुलाबराव पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली

वृत्तसंस्था

आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनेकदा सांगितले, मात्र त्यांनी आपले ऐकले नाही. त्यांनी आपल्याला सोडले, ‘वर्षा’ सोडले; परंतु ते शरद पवार यांना सोडण्यास काही तयार नाहीत, अशी खोचक टीका बंडखोर आमदार आणि पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर केली आहे.

गुवाहाटीवरून निघण्याआधी बंडखोरांची बैठक झाली. त्या बैठकीत गुलाबराव पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गुलाबराव पाटील म्हणाले, “आपल्या सोबतचे आणि अपक्ष आमदार सभागृहात डिबेट करण्यासाठी त्यांना पुरेसे आहेत. हे होण्यापूर्वी ठाकरे यांना आपण याबाबत सर्व सांगितले होते. आम्हाला उद्धव ठाकरेंमुळे मंत्रिपद मिळाले, हे मान्य आहे. मात्र, यासाठी आम्हीही शिवसेनेसाठी कार्य केले आहे. कठीण परिस्थितीत आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवून कार्य केले आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळण्यात आमच्याही कामाचा सहभाग निश्‍चितच आहे. आम्ही काही केवळ आयत्या बिळावर नागोबा झालेलो नाही. त्यामुळे आगामी काळासाठी आम्हा सर्वांना एकत्र राहूनच लढाई लढायची आहे.”

दरम्यान, गुलाबरावांना पुन्हा पानटपरीवर जावे लागेल, या शिवसेना नेते संजय राऊतांनी केलेल्या टीकेला पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “राऊत मला पुन्हा पानटपरीवर चुना लावत बसेल, असे म्हणतात.

THANE : रामनवमीनिमित्त ट्रॅफिक निर्बंध; वागळे परिसरातील अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Ram Navami 2026 : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मुंबईत २००० ड्रोनचा भव्य शो; काय असणार खास? जाणून घ्या वेळ आणि स्थळ

केंद्र सरकारचा निर्णय; घरात PNG असेल तर LPG पुरवठा बंद, गॅस कनेक्शनवर नवे नियम लागू

Mumbai : ८७० रुपयांच्या वादातून संतापजनक प्रकार; ओशिवरामध्ये सिगारेट विक्रेत्याला कारने फरफटत नेले, घटना CCTV मध्ये कैद

मुंबईकरांना दिलासा; मेट्रो 2Bमुळे चेंबूर परिसरातील प्रवास होणार जलद