राष्ट्रीय

वातावरण बदलाचा गहू, तांदूळ उत्पादनाला फटका; १० टक्क्यांनी उत्पादन कमी झाल्याने भाववाढीची शक्यता

वातावरण बदलाचा देशाच्या तांदूळ आणि गहू उत्पादनाला फटका बसला असून या दोन्हींचे उत्पादन जवळपास ६ ते १० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : वातावरण बदलाचा देशाच्या तांदूळ आणि गहू उत्पादनाला फटका बसला असून या दोन्हींचे उत्पादन जवळपास ६ ते १० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याची किंमत मोजावी लागणार आहे, असा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.

वातावरण बदलाचा मोठा फटका मच्छिमारांनाही बसत आहे. समुद्राच्या किनाऱ्यावरील पाणी गरम होत असल्यामुळे माशांना खोल समुद्रातील थंड पाण्याचा आसरा घ्यावा लागत आहे. २०२३-२४ या पीकवर्षात भारतातील गव्हाचे उत्पादन ११३.२९ दशलक्ष टन इतके निघाले होते, तर तांदळाचे उत्पादन १३७ दशलक्ष टन इतके होते. देशातील १.४ अब्ज लोकसंख्या ही तांदूळ आणि गहू या दोनच प्रमुख पिकांवर आपला उदरनिर्वाह करत आहे. मात्र, यंदा वातावरणात बदल होत असल्याने गहू आणि तांदळाचे उत्पादन ६ ते १० टक्क्यांनी घसरणार आहे, असे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव