राष्ट्रीय

श्रीनगरमध्ये ५० वर्षांतील सर्वात कडाक्याची थंडी

सध्या देशाच्या बऱ्याच शहरांमध्ये थंड वातावरण असून श्रीनगरमध्ये शनिवारी गेल्या ५० वर्षांतील सर्वात कडाक्याची थंडी पडली.

Swapnil S

श्रीनगर : सध्या देशाच्या बऱ्याच शहरांमध्ये थंड वातावरण असून श्रीनगरमध्ये शनिवारी गेल्या ५० वर्षांतील सर्वात कडाक्याची थंडी पडली. शनिवारच्या रात्री श्रीनगरमध्ये उणे ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाच्या माहितीनुसार, श्रीनगरमध्ये १९७४ मध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती. शुक्रवारी रात्री श्रीनगरमधील तापमान मायनस (उणे) ६.२ अंश सेल्सिअस तापमानावरून उणे ८.५ अंश सेल्सिअस इतके घसरले होते. १९७४मध्ये श्रीनगर येथे सर्वात कमी म्हणजेच उणे १०.३ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले होते. तसेच १८९१नंतर श्रीनगरमध्ये सर्वात कमी तापमानाची तिसरी रात्र नोंदवली गेली.

हाडे गोठवणारी थंडी पडल्यामुळे श्रीनगरमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोठवणाऱ्या थंडीमुळे अनेक पाणवठे गोठले आहेत. त्याचबरोबर प्रसिद्ध दल सरोवराचा काही भाग आणि शहराच्या तसेच खोऱ्यातील अनेक भागांतील पाणीपुरवठा करणाऱ्या लाईन गोठल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा पुरवठा होत नाही. प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पुढील काही दिवसांतील आपले जम्मू येथील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

दिल्ली, हरयाणामध्ये पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीच्या पार्श्वभूमीवर पावसाचा इशारा दिला आहे. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत पाऊस पडणार आहे. पावसासोबतच कडाक्याची थंडीही वाढणार आहे. पावसासोबतच पुढील पाच ते सात दिवस थंडीची लाट येण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. रविवारी सकाळी दिल्लीत धुके आणि किमान तापमान ८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या - 'राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या...

"साखरेच्या सुरीने मित्रपक्षाचा गळा...मी केलेलं भाकित सत्यात उतरतंय"; प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशावर रोहित पवारांची बोचरी प्रतिक्रिया

Ram Sutar Passes Away : भारतीय शिल्पकलेतील युगाचा अंत; ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार यांचे निधन

मीरा भाईंंदरच्या अंतिम मतदार यादीतही प्रचंड घोळ; अनेक मतदारांची नावे ठाणे महापालिकेत तर १६०० मतदारांची नावे घरापासून लांब

भारत आणि ओमान आज मस्कतमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करणार