राष्ट्रीय

भाजप प्रतिनिधी मंडळाची नूहला भेट कॉँग्रेस, आपच्या प्रतिनिधींना रोखले

११ ऑगस्टपर्यंत इंटरनेट सेवा बंद, संचारबंदी सुरुच

नवशक्ती Web Desk

चंदीगड : कॉंग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाला नूंहमध्ये प्रवेश नाकारुन मंगळवारी माघारी पाठवण्यात आले तर बुधवारी आम आदमी पक्षाच्या प्रतिनिधींना देखील माघारी पाठवण्यात आल्यानंतर भाजपच्या प्रतिनिधी मंडळाला बुधवारी नूह मध्ये प्रवेश देण्यात आला. नूहमध्ये ब्रज मंडळ यात्रेदरम्यान झालेल्या हिंसेनंतर संचारबंदी लागू आहे. मात्र नागरिकांना गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी सकाळी ९ ते दुपारी १ वाजे पर्यंत संचारबंदी शिथिल केली जाते. तसेच नूंह जिल्ह्यात ११ ऑगस्ट पर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

बुधवारी भारतीय जनता पक्षांच्या प्रतिनिधी मंडळाला नूंह सीमेऐवजी सर्किट हाऊसपर्यंत जाण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री डॉ. बनवारीलाल व आमदार मोहनलाल बडोली, संजय सिंह, मेवात जिल्हाप्रभारी समय सिंह भाटी मंडळी दोन गाड्यांमध्ये बसून सर्किट हाऊसमध्ये पोहोचली. यावेळी संजय सिंह म्हणाले की ३१ जुलै रोजी झालेल्या घटनेचा दिवस कलंकित होता. ही दंगल पूर्णपणे सुनियोजित होती. ज्या लोकांची दुकाने फोडली आहेत, जाळपोळ झाली आहे त्यांनाच भेटायला जात आहोत. दंगलग्रस्त भाग अजूनही सामान्य झालेला नाही. तेथे शांतता राखण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच संचारबंदी सुरु ठेवण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सतत परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहेत. दंगलग्रस्त क्षेत्रात पोलीस जवान तैनात आहेत. नूंहमध्ये आतापर्यंत १४२ एफआयर दाखल झाले असून ३१२ जणांना अटक करण्यात आली आहे.

Mumbai : आता उद्यानांमध्ये मातांसाठी स्तनपान कक्ष; आराखडा तयार, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत समावेश करणार

संतापजनक! पाणी आणलं नाही म्हणून ९ वर्षांच्या मुलावर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू

Pune : नसरापूर ४ वर्षीय चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे कोण? पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

दिल्लीतील विवेक विहारमधील चार मजली इमारतीला भीषण आग; ९ जणांचा होरपळून मृत्यू

AC वापरताना या ७ चुका टाळा; दुर्लक्ष केल्यास आग किंवा स्फोटाचा धोका वाढू शकतो