राष्ट्रीय

भ्रष्टाचारात मोदी तरबेज - राहुल गांधी

सपाचे नेते यांच्यासमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राहुल गांधी पुढे म्हणाले की, विरोधकांच्या इंडिया आघाडीला वातावरण अनुकूल असल्याचे संकेत मिळत आहेत तर भाजप जेमतेम १५० आकडा गाठण्यापर्यंतच मजल मारणार आहे.

Swapnil S

गाझियाबाद : निवडणूक रोखे म्हणजे जगातील सर्वात मोठी खंडणी वसुली योजना होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारात तरबेज आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केला.

सपाचे नेते यांच्यासमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राहुल गांधी पुढे म्हणाले की, विरोधकांच्या इंडिया आघाडीला वातावरण अनुकूल असल्याचे संकेत मिळत आहेत तर भाजप जेमतेम १५० आकडा गाठण्यापर्यंतच मजल मारणार आहे.

लोकसभेची ही निवडणूक विचारसरणीची आहे, एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजप राज्यघटना आणि लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडी घटना आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी सरसावली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी, पक्ष आपल्याला जो आदेश देईल त्याचे आपण पालन करणार असल्याचे सांगितले.

जळगाव : एकनाथ खडसेंच्या घरात चोरी; रोकड-सोन्याचे दागिने लंपास, सूनेच्या पेट्रोल पंपावर दरोड्यानंतर महिन्याभरातच घडली घटना

मुंबई : रुग्णालयांतील अन्न निकृष्ट निघाल्यास फक्त ₹१००० दंड; BMC च्या टेंडरमधील अटींवर तज्ज्ञांकडून सवाल

Mumbai : मलबार हिलमधील 'एलिव्हेटेड नेचर ट्रेल' पावसाळ्यात ठरला 'हॉटस्पॉट'; सुमारे ३ लाख पर्यटकांची भेट, BMC च्या खात्यात तब्बल...

...तर झाडे तोडण्याची परवानगी मागे घेऊ! मुंबई मेट्रो, GMLR प्रकल्पावरून सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला इशारा

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यावरून सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना फटकारले; मुख्य सचिवांना हजर राहण्याचे दिले आदेश