राष्ट्रीय

पंतप्रधान मणिपूर पेटवू इच्छितात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये जे घडत आहे, ते लष्कर दोन दिवसांत रोखू शकते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरला पेटवू इच्छितात, वाचवू इच्छित नाहीत, असा घणाघाती आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला.

संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर दुपारी ३ वाजता राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, मणिपूर जळत असताना पंतप्रधान हसत हसत बोलत होते, हे त्यांना शोभत नाही. भारतात कुठेही हिंसाचार होत असल्यास त्यांनी हसत हसत बोलू नये. मी १९ वर्षे राजकारणात आहे. मी प्रत्येक राज्यात गेलो आहे. पूर, त्सुनामी, हिंसाचार होतो, तेथे आम्ही जातो. १९ वर्षांच्या अनुभवावरून मी सांगतो की, मणिपूरमध्ये मी जे पाहिले, ते कुठेही पाहिले नाही. आम्ही जेव्हा मणिपूरच्या मैतेईच्या परिसरात गेलो, तेव्हा आम्हाला सांगितले की, तुमच्या सुरक्षेत कुकी असल्यास आम्ही गोळी मारू. कुकी परिसरात गेलो तेव्हा सांगितले की, मैतेई सुरक्षेत असल्यास आम्ही गोळ्या मारू. मणिपूर दोन भागात विभाजित झाला आहे. भारतात काय होत आहे, हे पंतप्रधानांना समजत नाही. ते मणिपूरला जाऊ शकत नाहीत तर किमान त्याबाबत बोलावे तरी. मणिपूरमध्ये जे घडत आहे, ते लष्कर दोन दिवसांत रोखू शकते. पंतप्रधान मणिपूरला पेटवू इच्छितात, त्यांना ते वाचवण्याची इच्छा नाही, असे गांधी म्हणाले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस