काँग्रेस नेते जयराम रमेश एएनआय
राष्ट्रीय

‘सीडीएस’नी सिंगापूरला खुलासा का केला? काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा सवाल

भारताचे ‘सीडीएस’ जनरल अनिल चौहान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या संघर्षात पाकने भारताची विमाने पाडल्याप्रकरणी खुलासा सिंगापूरला का केला? असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताचे ‘सीडीएस’ जनरल अनिल चौहान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या संघर्षात पाकने भारताची विमाने पाडल्याप्रकरणी खुलासा सिंगापूरला का केला? असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.

‘सीडीएस’ चौहान यांनी सिंगापूरला विमान पाडली गेल्याचा खुलासा केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. रमेश म्हणाले की, लष्करी व परदेशी धोरणाबाबत सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावणे गरजेचे आहे. ‘सीडीएस’ जनरल अनिल चौहान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत महत्त्वाची माहिती सिंगापूरला असताना का दिली? तसेच पंतप्रधान व संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत पहिल्यांदा ही माहिती देणे गरजेचे होते, असे रमेश म्हणाले.

कारगिल युद्धानंतर भारताच्या संरक्षण तयारीबाबत विशेष पुनर्आढावा समिती तीन दिवसांत स्थापन केली गेली होती. आताही अशाच प्रकारची समिती स्थापन केली पाहिजे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे वडील त्या समितीचे अध्यक्ष होते. हा अहवाल संसदेत मांडून त्यावर व्यापक चर्चा झाली होती.

मुंबई महापालिकेत बदली घोटाळ्याचे सत्र कायम; ५५ अधिकाऱ्यांची पूर्वीच्या यादीतीलच पदस्थापना

पावसाळी हंगामात मांडवा-गेटवे जलवाहतूक बंद; २६ मेपासून सेवा स्थगित

Mumbai : आश्रय योजनेला CRZ च्या मंजुरीची प्रतीक्षा; मंजुरीसाठी मकरंद नार्वेकरांचे एमसीझेडएमएला पत्र

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प : विक्रोळीत ३५० टनी महाकाय कटरहेड भुयारात दाखल; मिठी नदीखाली खोदणार बोगदा

Mumbai : पालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना जनगणनेचे काम; म्युनिसिपल मजदूर युनियनचा तीव्र विरोध