राष्ट्रीय

घटना व लोकशाही वाचविण्यासाठी भाजपचा पराभव आवश्यक; भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांचे प्रतिपादन

धर्मनिरपेक्ष लोकशाहीवर आक्रमण झाले असून घटना आणि लोकशाही वाचविण्यासाठी भाजपचा पराभव करणे आवश्यक आहे. यासाठीच...

Swapnil S

नवी दिल्ली : धर्मनिरपेक्ष लोकशाहीवर आक्रमण झाले असून घटना आणि लोकशाही वाचविण्यासाठी भाजपचा पराभव करणे आवश्यक आहे. यासाठीच २०२४ च्या लोकसभा निवडणुका भारताच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी एका मुलाखतीत केले.

राम मंदिराच्या अभिषेकचा आगामी सार्वत्रिक निवडणुकांवर निर्णायक प्रभाव पडेल या विधानाला वा अटकळीला त्यांनी नकार दिला. त्या संबंधात ते म्हणाले की, ‘रामा’बद्दल भाजपची समज लोकांच्या प्रभूबद्दलच्या समजापेक्षा वेगळी आहे. त्यांनी भाजपच्या ‘मोदी की हमी’ घोषणेला निवडणुकांपूर्वी निवडणुकीच्या फायद्यासाठी तयार केलेली एक घोषणा म्हणून फेटाळून लावले आणि त्याला त्यांनी एक ‘जुमला’ म्हणून संबोधले.

नोकऱ्यांबाबत, काळा पैसा परत आणण्यात आणि महागाईवर मात करण्यात पंतप्रधान मोदी अपयशी ठरले आहेत, असे ते म्हणाले. २०२४ च्या निवडणुका देशासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी अतिशय गंभीर आहेत. गेल्या १० वर्षांपासून आपण जे पाहिले ते एक विनाशकारी शासन आहे. श्रीमान मोदींनी जास्तीत जास्त प्रशासन, किमान सरकारचा दावा केला, परंतु प्रशासन किमान, अगदी वजाही झाले आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. संसद निरर्थक होत आहे, असे ते म्हणाले.

गेल्या हिवाळी अधिवेशनात संसदेतून १४० हून अधिक खासदारांना निलंबित करण्यात आले हे अभूतपूर्व आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

प्रवाशांनो लक्ष द्या! UTS ॲपमधून ट्रेन पास बुकिंग बंद; आता RailOne वापरा; मिळेल ३ टक्के डिस्काउंटही, वाचा सविस्तर

४० ठार, १०० जखमी; नववर्षाच्या पार्टीदरम्यानच बारमध्ये भीषण स्फोट; स्वित्झर्लंडच्या आलिशान 'स्की रिसॉर्ट'मध्ये मोठी दुर्घटना

एबी फॉर्म गिळला की फाडला? पुण्यातील शिंदेसेनेच्या उमेदवाराने स्वतः केला खुलासा, म्हणाले - "भावनेच्या भरात माझ्याकडून...

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईच्या लोकल ट्रेन्सची खास 'हॉर्न सलामी'; रात्री १२ चा ठोका वाजताच CSMT वर जल्लोष; Video व्हायरल

नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी; 'या' जिल्ह्यांना थेट फायदा