राष्ट्रीय

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे

राजधानी दिल्लीने दिवाळीच्या सकाळी धुक्याच्या जाड थरासह दिवसाची सुरुवात केली. कारण शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ‘अतिशय खराब’ या श्रेणीत घसरला असून तो ३०० एक्यूआयच्या पुढे गेला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीने दिवाळीच्या सकाळी धुक्याच्या जाड थरासह दिवसाची सुरुवात केली. कारण शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ‘अतिशय खराब’ या श्रेणीत घसरला असून तो ३०० एक्यूआयच्या पुढे गेला आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘समीर’ (SAMEER) ॲपनुसार, सकाळी ९ वाजता दिल्लीचा एकूण एक्यूआय ३३९ नोंदवण्यात आला. सुमारे ३८ निरीक्षण केंद्रांच्या आकडेवारीनुसार, शहरातील बहुतेक भागांमध्ये हवा गुणवत्ता पातळी ३०० च्या पुढे होती.

आनंद विहार येथे एक्यूआय ४१४ तर वजीरपूर येथे ४१२ नोंदवला गेला, जे ‘गंभीर’ श्रेणीत मोडतात. बवाना (३६९), पुसा (३७१) आणि अशोक विहार (३९४) या ठिकाणी हवा गुणवत्ता ‘अतिशय खराब’ श्रेणीत राहिली, तर श्रीअरविंदो मार्ग (१६५) आणि दिल्ली तांत्रिक विद्यापीठ परिसर (१९८) येथे तुलनेने थोडीशी चांगली स्थिती दिसली.

यापूर्वी हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने दिल्ली -एनसीआरमध्ये ‘ग्रेडेड रिस्पॉन्स अ‍ॅक्शन प्लॅन’चा (ग्रॅप) दुसरा टप्पा लागू केला आहे. हा निर्णय शनिवारी प्रदूषणाची वाढती पातळी आणि भारतीय हवामान विभाग तसेच भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या अंदाजांवर आधारित आढावा बैठकीनंतर घेण्यात आला. दोन्ही संस्थांनी पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी बिघडण्याचा इशारा दिला होता.

गेल्या बुधवारी, सर्वोच्च न्यायालयाने काही अटींसह दिल्ली-एनसीआरमध्ये ‘हरित फटाके’ विक्री करण्यास व फोडण्यास परवानगी दिली होती. दिवाळीच्या आदल्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० या वेळेत फटाके फोडण्याची परवानगी देण्यात आली होती. दरम्यान, सकाळी ८.३० वाजता दिल्ली शहरात किमान तापमान २०.२ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले.

OCI कार्डधारकांना ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत संरक्षण; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Mumbai : अंधेरी-घाटकोपर प्रवाशांना मोठा दिलासा; मेट्रो वन आता दर ३ मिनिटांनी धावणार

Mumbai : पदपथांच्या पाहणीत हयगय झाल्यास अभियंते जबाबदार; 'पादचारी प्रथम' या अभियानांतर्गत प्रशासनाचा इशारा

Mumbai : डेंग्यूच्या अळ्यांची तपासणी जीवावर बेतली; कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्याचा पडून मृत्यू

Mumbai : मुलुंड येथील बेस्ट बस अपघात प्रकरण; चालकाविरोधात गुन्हा, बस पोलिसांच्या ताब्यात