राष्ट्रीय

मुंबई-दिल्ली महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन; काँग्रेसवर साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सर्वात मोठ्या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले, यावेळी त्यांनी काँग्रेसवर केली टीका

प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबई दिल्ली महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. दौसा येथे झालेल्या कार्यक्रमावेळी त्यांनी भंडारेज ते सोहना या तयार महामार्गाचे उद्घाटन केले. दिल्ली-मुंबई महामार्ग हा देशातील सर्वात मोठा महामार्ग असेल. यावेळी जनतेला संबोधन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "काँग्रेसच्या नेतृत्वातील केंद्र सरकार सीमाभागात रस्ते बांधण्यास घाबरत होते. आपण बांधलेल्या रस्त्याने शत्रू देशात येतील, अशी त्यांना भीती वाटत होती. आपल्या सैनिकांच्या शौर्य व धाडसाला काँग्रेस का कमी लेखत होती? हे मला कळत नाही." असे म्हणत काँग्रेसला टोला लगावला.

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, "हेच विकसित होणाऱ्या भारताचे भव्य चित्र असून असे आधूनिक रस्ते बनतात तेव्हा देशाच्या प्रगतीला चालना मिळते. हा प्रकल्प राजस्थानसह मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरातचे चित्र बदलून टाकणार आहे. आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याची आणखी एक बाजू आहे. तो तयार झाल्यावर शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी या सर्वांना अनेक सुविधा मिळतात. दिल्ली - दौसा - लालसोट दरम्यानच्या या महामार्गाप्रमाणे जयपूर ते दिल्ली प्रवासाचा वेळ निम्म्या वेळेने कमी होईल." असे त्यांनी सांगितले.

Mumbai: कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांना लवकरच दिलासा; १५ डब्यांच्या लोकलबाबत खूशखबर

Mumbai : मोदींच्या उपस्थितीत NESCO मधील इव्हेंटदरम्यान टॉयलेटमध्ये बेशुद्ध पडले होते माजी ऑस्ट्रेलियन मंत्री; तातडीच्या मदतीने वाचला जीव

तरुणांच्या विवाह योगात बिबट्यांचे विघ्न; दहशतीमुळे पुणे जिल्ह्यात विवाहेच्छुक तरुणांना मुली मिळेनात

‘४२ कोटींची वसुली नोटीस कशासाठी?’ मुंढवा जमीन प्रकरणात महसूलमंत्र्यांचे आश्चर्य; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

Mumbai : नॅशनल पार्कमधील अतिक्रमित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी जागा शोधा; उच्च न्यायालयाचे आदेश