राष्ट्रीय

दिवाळी हंगामात विमान भाडे ३०० टक्क्यांनी वाढले

भारताचा सर्वात व्यस्त मार्ग मुंबई-दिल्लीवर देखील १२०% पर्यंत वाढ झाली असून सध्याचे भाडे ११ ते ३० हजार रुपये झाले आहे.

Swapnil S

धैर्य गजारा / मुंबई : दिवाळी सणांच्या हंगामात लोकप्रिय मार्गावरील घरगुती विमानतळाचे भाडे सुमारे ३०० टक्क्याने वाढले आहे.

सण-उत्सव आणि सुट्ट्यांच्या हंगामात विमान तिकीटांची किंमत मागणीनुसार डायनॅमिक प्राइसिंगमुळे वाढते. दिवाळीच्या काळात लोक आपल्या मूळ ठिकाणी सण साजरा करण्यासाठी किंवा सुट्टीत गुणवत्तापूर्ण वेळ घालवण्यासाठी प्रवास करतात, त्यामुळे प्रवाशांची संख्या खूप वाढते. रेल्वे तिकिटांचा, विशेषतः तात्काळ तिकिटांचा अभावही भाड्यात वाढीचे कारण आहे, जे दोन ते तीन मिनिटांतच विकले जातात.

दिवाळीच्या आठवड्यात मुंबईहून सुरू होणाऱ्या काही मार्गांवर विमानभाड्यात ३०% ते ४००% पर्यंतची मोठी वाढ नोंदवली जात आहे. मुंबई-दिल्ली मार्ग, जो सामान्यतः ४५०० ते ८५०० रुपयांमध्ये असतो, त्यावर ४३३% वाढ नोंदवून २४,००० ते २८००० रुपये झाले आहेत. त्यानंतर मुंबई-लखनऊ मार्गावर ३६०% वाढ झाली असून भाडे २३ ते ३० हजार रुपये झाले आहे. अमृतसरसाठी फ्लाइटचे भाडे २० ते २२ हजार रुपये असून जयपूरसाठी १६ ते २६ हजार रुपये, अनुक्रमे २४४% आणि २०४% वाढ नोंदवली गेली आहे.

भारताचा सर्वात व्यस्त मार्ग मुंबई-दिल्लीवर देखील १२०% पर्यंत वाढ झाली असून सध्याचे भाडे ११ ते ३० हजार रुपये झाले आहे. मोनोपॉलीवर चालणाऱ्या मुंबई-भुज मार्गावर १९२% ने वाढ नोंदवली गेली आहे. चेन्नई, अहमदाबाद आणि बंगलोरसारख्या इतर मार्गावर अनुक्रमे ५०%, ३३% आणि ३०% वाढ नोंदवली गेली आहे.

काही मार्गांवर दोन अंकी वाढ दिसली असली, तरी काही महागड्या मार्गावर तीन अंकी वाढही दिसून येते. या घरगुती मार्गांचे भाडे मध्य-पूर्व आणि दक्षिण-पूर्व आशियातील अनेक आंतरराष्ट्रीय मागपिक्षा अधिक झाले आहे.

"पटेल जिंकले तरी नेहरू PM कसे?" इतिहास सांगत अमित शहांचा काँग्रेसवर पलटवार

लाडक्या बहिणींना दिलासा; पात्र बहिणींसाठी योजना सुरूच राहणार, ८ हजार कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल

‘५०% रक्कम भरा आणि दंड मिटवा’, सरकारचा मोठा निर्णय : दंडाची रक्कम FASTag मधून वसूल होणार

Nashik : त्र्यंबकेश्वरमध्ये आईनेच तब्बल ६ मुलांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस; जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

BCCI कडून अखेरच्या क्षणी IPL लिलाव यादीत मोठा बदल; माजी RCB खेळाडूसह नवीन ९ जणांचा समावेश