राष्ट्रीय

काँग्रेसकडून राजस्थान, मिझोरामसाठी निवडणूक आढावा बैठक

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : राजस्थान आणि मिझोराम येथील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्रपणे दोन बैठका शनिवारी आयोजिल्या होत्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (एआयसीसी) मुख्यालयात ही आढावा बैठक बोलावली, ज्यात पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. मिझोरामसाठी आढावा बैठक यापूर्वी आयोजित करण्यात आली होती, तर माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि इतर वरिष्ठ नेत्यांसह राजस्थानमधील नेते तसेच एआयसीसीचे सरचिटणीस, संघटना, के. सी. वेणुगोपाल हे देखील आढावा बैठकीत उपस्थित होते.

राजस्थानचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा म्हणाले की, आमचा मतांचा वाटा देखील भाजपपेक्षा थोडा कमी होता आणि त्यातही गेल्या वेळेपेक्षा थोडी सुधारणा झाली आहे.

आमचे अनेक उमेदवार थोड्या फरकाने पराभूत झाले आणि आम्ही वरिष्ठ नेत्यांना सांगितले की, आम्ही आजपासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करू. आम्ही आमच्या उणिवा शोधून त्यावर काम करू. आम्ही नेतृत्वाला आश्वासन दिले की आम्ही लढू. लोकसभा निवडणुकीत भाजप एकजुटीने, राजस्थानमध्ये काँग्रेसने एकदिलाने निवडणूक लढवली, असे त्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

प्रदीर्घ काळानंतर काँग्रेस पक्षाने राजस्थानमध्ये चांगली कामगिरी केल्याचे नेतृत्वाला वाटले. प्रदीर्घ कालावधीनंतर पक्षाला इतक्या जागा मिळाल्या, असे ते म्हणाले. त्यांनी राजस्थानच्या प्रभारीपदाचा राजीनामा देण्याची ऑफर दिली की नाही यावर रंधावा म्हणाले की, मी सांगितले की मी फक्त निवडणुकीपर्यंत तिथे होतो. कारण मला पंजाबवरही लक्ष केंद्रित करायचे आहे. मी आधी सांगितले होते की, विधानसभा निवडणुकीपर्यंत तिथे राहणार आहे. आम्ही कसे मागे राहिलो, आम्ही याकडे लक्ष देऊ, तसेच आम्ही जबाबदारी निश्चित करू.

मिझोरामचे प्रभारी भक्त चरण दास म्हणाले की, आम्ही मिझोराम निवडणुकीच्या प्रत्येक पैलूवर चर्चा केली, ज्यात राज्याच्या तळागाळातील संघटनात्मक रचना आणि राज्यपातळीवर तसेच निवडणुकीदरम्यान घडलेल्या विविध घटनांचा समावेश आहे. आम्ही आमच्या भविष्यातील योजनांवरही चर्चा केली. या सर्व बाबींवर काळजीपूर्वक आणि सखोल चर्चा करण्यात आली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस