राष्ट्रीय

Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरुधात गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

प्रतिनिधी

प्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्याविरोधात राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेले बाबा रामदेव हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेले काही दिवस एक व्हिडीओ वायरल होत असून त्यामध्ये राजस्थानच्या एका कार्यक्रमात मुस्लिम धर्माबाबत केलेल्या विधानामुळे भावना दुखावल्याचे तक्रार राजस्थानच्या बरमार जिल्ह्यातील चौहतान पोलीस स्थानकात एका स्थानिक नागरिकाने केली आहे. यावरून त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम १५३ अ, २९५ अ आणि २९८ अंतर्गत धार्मिक भावना भडकवणे, सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणे, धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्य करणे अशा आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमकं प्रकरण काय?

राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, “धर्मांतराच्या बाबतीत मुस्लीम आणि ख्रिश्चन समानच आहेत. मी कुणावरही टीका करत नाही आहे, पण काही लोकांना इतर धर्मातून आपल्या धर्मात धर्मांतरित करण्याची फार ओढ असते. इस्लाम धर्माचा अर्थ फक्त नमाज पठण करणे असून ५ वेळा नमाज पठण केल्यावर काहीपण करु शकता. मग हिंदू मुलींना उचलून घेऊन जा किंवा दहशतवादी बनून मनात येईल ते करा. ५ वेळा नमाज पठण केल्यानंतर जन्नत मिळते. जन्नतमध्ये मद्य मिळत असेल पण अशी जन्नत जहन्नुमपेक्षा वाईट. सर्व जातीतील लोकांचा इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे”, असं ते म्हणाले होते. “चर्चमध्ये जाऊन मेणबत्ती लावल्याने सर्व पापं धुतली जातात. पण, हिंदू धर्मात असे होत नाही. असे कुराण आणि बायबलमध्ये लिहले नाही, मात्र असे सांगितले जाते." त्यांनी केलेल्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Terrorist Attack in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हवाई दलाच्या वाहनावर हल्ला; एक जवान शहीद, चार जखमी!

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

World Laughter Day 2024: हसत राहा! हसल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण