राष्ट्रीय

इराणमधील भारतीयांची पहिली तुकडी मायदेशात दाखल

इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने तेथील भारतीयांना तातडीने मायदेशी परतण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार शनिवारी विद्यार्थ्यांसह अनेक भारतीय नागरिक भारतात परतले. इराणमधील भारतीय नागरिकांची पहिली तुकडी शुक्रवारी रात्री विमानाने दिल्लीत दाखल झाली.

Swapnil S

नवी दिल्ली : इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने तेथील भारतीयांना तातडीने मायदेशी परतण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार शनिवारी विद्यार्थ्यांसह अनेक भारतीय नागरिक भारतात परतले. इराणमधील भारतीय नागरिकांची पहिली तुकडी शुक्रवारी रात्री विमानाने दिल्लीत दाखल झाली. मात्र, किती भारतीय नागरिक मायदेशात आले ते कळू शकले नाही.

दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर अली नक्वी या भारतीय नागरिकाला विचारण्यात आले की, इराणमध्ये कोणत्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र, त्याने कोणतीही समस्या भेडसावली नाही, असे सांगितले.

वैद्यकीय शिराजमधील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने सांगितले की, इंटरनेट सेवा उपलब्ध नव्हती, त्यामुळे त्या देशात काय चालले आहे याची कल्पनाच येत नव्हती. मात्र, शहरातील स्थिती सामान्य होती, असेही तिने सांगितले.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण