प्रातिनिधिक छायाचित्र 
राष्ट्रीय

उत्तर प्रदेशात अन्न विषबाधा : ४ मुलांचा तडफडून मृत्यू

उत्तर प्रदेशमधील लखनऊमधील पारा परिसरात एका सरकारी पुनर्वसन केंद्रात झालेल्या अन्न विषबाधेमुळे ४ मुलांचा तडफडून मृत्यू झाला, तर २० मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

Swapnil S

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील लखनऊमधील पारा परिसरात एका सरकारी पुनर्वसन केंद्रात झालेल्या अन्न विषबाधेमुळे ४ मुलांचा तडफडून मृत्यू झाला, तर २० मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

या केंद्रात राहणारी २० मुले मंगळवारी संध्याकाळी अचानक आजारी पडली. त्यानंतर या मुलांना लोकबंधू रुग्णालयात नेण्यात आले. लोकबंधू राज नारायण संयुक्त रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजीव कुमार दीक्षित यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी पुनर्वसन केंद्रातील सुमारे २० मुलांना रुग्णालयात आणण्यात आले. ही सर्व मुले मानसिकदृष्ट्या अपंग आहेत. जेव्हा या मुलांना रुग्णालयात आणण्यात आले, तेव्हा त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर होती.

चौकशी समितीची स्थापना

या घटनेनंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. लखनऊच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या अन्न विषबाधेमागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना केली आहे. तपासासाठी पुनर्वसन केंद्रामधून जेवणाचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर या तपासासाठी नगर निगम आणि अन्न विभागाच्या पथकालाही तैनात करण्यात आले आहे. केंद्राने या घटनेची माहिती योग्य वेळी रुग्णालयाला का दिली नाही, याचाही तपास होणार आहे.

कोकणचा काजू आता ‘जागतिक ब्रँड’ होणार; ४० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

Mumbai : "लक्ष द्या जरा साहेब!" ; बोरिवली स्थानकावरील पादचारी पुलाला तडे? व्हायरल व्हिडिओमुळे प्रवाशांमध्ये चिंता

परिवहन मंत्र्यांच्या ठाण्यातील ST डेपो दुर्लक्षित; १५ दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलन, शिवसेना उबाठा आक्रमक

Mumbai : वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांचा अहवाल द्या; राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांचे निर्देश

साताऱ्यातील कण्हेर धरणावरील हेल्पर ते केनियातील कृषी सम्राट; कष्ट आणि जागतिक यशाची भावस्पर्शी प्रेरणागाथा