अरविंद केजरीवाल संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

केजरीवाल यांच्याविरोधात हरयाणा सरकार गुन्हा दाखल करणार; यमुना नदीत विष मिसळल्याचा आरोप भोवणार

यमुना नदीच्या पाण्यात हरयाणा सरकारने विष मिसळल्याचा आरोप ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला होता.

Swapnil S

नवी दिल्ली : यमुना नदीच्या पाण्यात हरयाणा सरकारने विष मिसळल्याचा आरोप ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला होता. या आरोपप्रकरणी हरयाणा सरकारकडून केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

हरयाणाचे कॅबिनेट मंत्री विपुल गोयल यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांनी यमुनेत विष मिसळल्याच्या केलेल्या आरोपाबाबत हरयाणा सरकार केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा नोंदवेल.

आपत्ती व्यवस्थापनाच्या कलम २ ड, १५४ अंतर्गत सोनीपत येथील ‘सीजेएम’ न्यायालयात गुन्हा दाखल केला जाईल. केजरीवाल यांनी हरयाणा आणि दिल्लीतील लोकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम केले आहे.

हरयाणाच्या मुख्यमंत्री प्यायले यमुनेचे पाणी

केजरीवाल यांच्या आरोपानंतर हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी त्यांच्या पल्ला गावात पोहोचले आणि तेथे ते यमुनेचे पाणी प्यायले. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सीएम सैनींना सोबत पल्ला घाटावर जाऊन यमुनेच्या पाण्याची चाचणी करण्याचे आव्हान दिले होते.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान

महाराष्ट्रात जनावरांचे पहिले 'ब्युटी पार्लर'; लोकसहभागातून 'या' ग्रामपंचायतीचा नावीन्यपूर्ण उपक्रम

Mumbai : लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या आईला ४ लाखांची भरपाई; उच्च न्यायालयाचा मध्य रेल्वेला दणका

Mumbai : ‘आराम’ हॉटेलचे अस्तित्व धोक्यात? रहेजाकडून कॅपिटल सिनेमाचे संपादन; जागा रिकामी करण्याच्या ऑफर

दादर स्थानकावर नवा प्लॅटफॉर्म; पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा विस्तार, मध्य रेल्वेचा पश्चिम रेल्वेकडे जमिनीसाठी पाठपुरावा