राष्ट्रीय

श्रीगंगानगरमध्ये ४८ अंश तापमान; उन्हाच्या झळांमुळे घराबाहेर पडणे कठीण

पावसाळा सुरू झाल्यानंतरही राजस्थानात सूर्य आग ओकत आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उन्हाच्या झळांमुळे लोकांना घरातून बाहेर पडणे नकोसे होऊ लागले आहे.

Swapnil S

जयपूर : पावसाळा सुरू झाल्यानंतरही राजस्थानात सूर्य आग ओकत आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उन्हाच्या झळांमुळे लोकांना घरातून बाहेर पडणे नकोसे होऊ लागले आहे.

उष्णतेने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. राजस्थानच्या श्रीगंगानगर शहराचे तापमान बुधवारी ४८ अंशांवर पोहचले होते. विशेष म्हणजे बाडमेर व जैसलमेरपेक्षा जास्त तापमान जयपूरमध्ये आहे. जैसलमेरमध्ये ४३.७ अंश, बाडमेर ४४.२ अंश, तर जयपूरमध्ये ४४.४ अंश तापमान नोंदले गेले.

जम्मूत ४४.४ अंश तापमान

जम्मूत ४४.४, सांबा ४६.८ अंश, उधमपूर ४२.४ अंश, रामबन ४१.९ अंश व राजौरीत ४०.२ अंश तापमान नोंदवले गेले आहे. हे तापमान सरासरी तापमानापेक्षा ५ ते ७ अंशांनी वाढले गेले.

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती

श्रीरामपूरमधील जमीन मंत्र्याच्या घशात घालण्याचा डाव! काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांचा आरोप

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपहारगृहाचा गॅससाठा संपला; रोजच्या १५०० लोकांच्या जेवणाचे वांदे

Thane : व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार; हॉटेल व्यावसायिकांची कारवाईची मागणी

खटला सुरू नसताना आरोपीला बेमुदत काळासाठा डांबता येणार नाही! सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा