राष्ट्रीय

आसाममधील अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाचा दोन लाख लोकांना फटका

वृत्तसंस्था

देशातील एका भागात उष्णतेने थैमान घातले आहे, तर दुसरीकडे आसाममध्ये पुराने थैमान घातले आहे. आसाममधील अनेक भागांना अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाचा फटका बसला आहे. यामुळे दोन लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. आसामच्या बराक व्हॅली आणि दिमा हासाओ जिल्ह्यासह शेजारच्या त्रिपुरा, मिझोराम आणि मणिपूरच्या काही भागांत रस्ते आणि रेल्वे संपर्क विस्कळीत झाला आहे.

मंगळवारी आसाम आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला असून भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, भूस्खलनात एका महिलेसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे अनेक भागात भूस्खलन झाले आहे. राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये दोन लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे.

आसाममध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी लष्करासह निमलष्करी दल, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, एसडीआरएफ, नागरी प्रशासन आणि प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. कचार जिल्हा प्रशासन आणि आसाम रायफल्स यांच्या संयुक्त उपक्रमाने बरखला भागातील पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील तीन दिवस या प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच हवामान खात्याने बुधवारी आसाममध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट: HC कडूनही झटका; तातडीने सुनावणी घेण्यास नकार, कधीही होऊ शकते अटक

दादर स्थानकात बदलापूर-CSMT एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाही; प्रवाशांचा संताप, मोटरमनला जाब - Video व्हायरल

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर