अति प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये तंबाखू? ICMR कडून लक्षणांचा अभ्यास नाही! 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

अति प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये तंबाखू? ICMR कडून लक्षणांचा अभ्यास नाही!

अति प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये तंबाखू उत्पादने आणि इतर सवय लावणाऱ्या पदार्थांप्रमाणे व्यसनाधीनतेसारखी वर्तणूक वैशिष्ट्ये दिसून येतात का याचा अभ्यास करण्यासाठी ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’ने (आयसीएमआर) कोणताही अभ्यास केलेला नाही, अशी माहिती शुक्रवारी लोकसभेत देण्यात आली.

Swapnil S

नवी दिल्ली : अति प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये तंबाखू उत्पादने आणि इतर सवय लावणाऱ्या पदार्थांप्रमाणे व्यसनाधीनतेसारखी वर्तणूक वैशिष्ट्ये दिसून येतात का याचा अभ्यास करण्यासाठी ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’ने (आयसीएमआर) कोणताही अभ्यास केलेला नाही, अशी माहिती शुक्रवारी लोकसभेत देण्यात आली.

लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, उपलब्ध जागतिक वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे, अति-प्रक्रिया केलेल्या अन्नाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने लठ्ठपणा, टाईप २ मधुमेह, हृदयरोग आणि मानसिक विकार यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.

या आरोग्य समस्यांमागे अनेक कारणे असतात आणि अति प्रक्रिया केलेल्या अन्नाचे जास्त सेवन हा त्यापैकी सुधारण्यायोग्य घटकांपैकी एक मानला जातो. उपलब्ध पुरावे मुख्यत्वे निरीक्षणावर आधारित आहेत आणि ते स्वतःहून थेट कारण-परिणाम संबंध सिद्ध करत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

जाधव म्हणाले की, अति प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या अति सेवनामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी परिषदेने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांनी सांगितले की, ‘डायटरी गाईडलाइन्स फॉर इंडियन्स, २०२४’ मध्ये साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवणे, साखरयुक्त पेयांचे वारंवार सेवन टाळणे, अति प्रक्रिया केलेले अन्न कमीत कमी खाण्याची शिफारस केली आहे. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अति प्रक्रिया केलेले अन्न ओळखणे, फूड लेबल्स वाचण्याबाबतचा सल्लाही समाविष्ट आहे.

निरोगी खाण्याच्या सवय प्रोत्साहनासाठी उपक्रम

आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी माहिती दिली की, ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने’देखील निरोगी खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये ‘ईट राईट इंडिया’ चळवळ, चरबी, मीठ आणि साखरेचे सेवन कमी करण्यासाठी ‘आज से थोडा कम’ मोहीम आणि लठ्ठपणावरील सोशल मीडिया मोहिमांचा समावेश आहे.

एफएसएसएआयने मायगव्हच्या सहकार्याने ‘ईट राईट क्विझ ऑन ओबेसिटी’ सुरू केली आहे आणि ग्राहकांना फूड लेबल्सची समज सुधारण्यासाठी मोहीमदेखील चालवत आहे, असे ते म्हणाले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : दुचाकींसाठी १० ऑगस्टपासून नवीन नोंदणी; एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास दुपारी लिलाव

Nashik : भाजप नेते विजय चौधरींना अटक; महिला नेत्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा भोवली

विद्यार्थ्यांचे प्रकल्प पेटंटमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्राध्यापकांना प्रशिक्षण

... तर कर्मचारी राजीनामा देऊ शकतात! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा

Mumbai : मुलाच्या हत्या प्रकरणातून वडिलांची निर्दोष मुक्तता; तपासात गंभीर त्रुटी, कोणतेही ठोस पुरावे नाहीत