गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत इमिग्रेशन आणि फॉरेनर्स बिल २०२५ सादर केले. 
राष्ट्रीय

वैध पासपोर्टशिवाय भारतात प्रवेश केल्यास तुरुंगवास व दंड; ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल २०२५′ लोकसभेत सादर

Immigration and Foreigners Bill 2025 : भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या स्थलांतर प्रक्रियेला सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने लोकसभेत ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल-२०२५’ सादर केले.

Krantee V. Kale

भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या स्थलांतर प्रक्रियेला सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने लोकसभेत ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल-२०२५’ सादर केले. या विधेयकानुसार, जर कोणी परदेशी व्यक्तीला बेकायदेशीरपणे देशात आणले, सामावून घेतले किंवा स्थायिक केले, तर त्याला ३ वर्षांचा तुरुंगवास किंवा २ ते ५ लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

कोणत्याही परदेशी व्यक्तीला भारतात प्रवेश करण्यासाठी 'वैध पासपोर्ट आणि व्हिसा' असणे अनिवार्य असेल. लोकसभेत विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला. प्रस्तावित कायद्यानुसार, परदेशी नागरिकांना विविध कायद्यांनुसार शिक्षा होऊ शकते. ‘पासपोर्ट कायदा, १९२०’, ‘परदेशी नोंदणी कायदा, १९३९’, ‘परदेशी कायदा, १९४६’, ‘इमिग्रेशन कायदा, २०००’नुसार सरकार परदेशी लोकांना भारतात येण्यापासून रोखू शकते.

जर कोणत्याही शैक्षणिक किंवा वैद्यकीय संस्था, रुग्णालय किंवा खाजगी निवासस्थानाच्या मालकाने परदेशी नागरिक ठेवला असेल तर त्यांना प्रथम सरकारला त्याबद्दल माहिती द्यावी लागेल. जर कोणताही परदेशी व्यक्ती कोणत्याही संस्थेत प्रवेश घेत असेल तर त्याला त्याची माहिती एका नमुन्यात भरावी लागेल आणि ती नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागेल.

Mumbai : कंत्राटदारांना १२.५ कोटींचा दंड; मेट्रो मार्गिका ९ वर सुरक्षेचा भंग

Navi Mumbai : क्रेन कोसळून दोघा कामगारांचा मृत्यू

Pune : उत्सवामध्ये लाऊडस्पीकरच्या मर्यादांचे पालन करा! गिरीश महाजन यांचे आवाहन

Goa : अभिनेत्याच्या कारची बाप-लेकाच्या दुचाकीला जोरदार धडक; मदतीऐवजी स्थानिकांशी वाद, पत्नीवरही 'थुंकल्याचा' आरोप

विकसित भारतासाठी बँकिंग! सरकार उच्चस्तरीय समिती स्थापन करणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा