राष्ट्रीय

जम्मू-काश्मिरात दगडफेकीचे प्रकार ९१ टक्के घटले

३७० कलम हटवल्यानंतरचा परिणाम

नवशक्ती Web Desk

श्रीनगर : जम्मू-काश्मिरात कलम ३७० हटवल्यानंतर दगडफेकीच्या घटना ९१ टक्के कमी झाल्या आहेत. २०१५ ते २०१९ दरम्यान ५०६३ दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या, तर २०१९ ते २०२३ दरम्यान ४३४ घटना घडल्या.

दहशतवादी व त्यांच्या साथीदारांना होणाऱ्या अटकेचे परिणाम ५ पट वाढले आहेत. २०१५ ते २०१९ दरम्यान ४२७ दहशतवाद्यांना अटक झाली होती, तर

२०१९ ते २०२३ दरम्यान २३२७ दहशतवाद्यांना पकडले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी कलम ३७० हटवण्यापूर्वी व नंतरच्या ४ वर्षांतील गुन्हेगारी घटनांची माहिती जारी केली. २०१५ ते २०१९ दरम्यान ३२९ सुरक्षा दलांच्या जवानांचा मृत्यू झाला. २०१९ ते २०२३ दरम्यान १४६ सुरक्षा दलांच्या जवानांचा मृत्यू झाला.

''तेव्हाच थांबायला हवं होतं''; प्रकाश महाजन यांची मनसेला सोडचिठ्ठी, नाराजीचे कारण समोर

भारत-पाकिस्तान सामना : ''देशभक्तीचा व्यापार सुरू''; उद्धव ठाकरे यांचे भाजपवर टीकास्त्र

"BCCI च्या कुटुंबाचं कोणी मेलं नाही"; भारत-पाक सामन्यावर भडकली पहलगाम हल्ल्यातील पिडीतेची पत्नी; क्रिकेटर, स्पॉन्सर्सना घेतलं धारेवर

रक्त व क्रिकेट एकत्र कसे असू शकते? भारत-पाकिस्तान सामन्यावरून आदित्य यांची टीका

संपूर्ण देशात फटाक्यांवर बंदी हवी; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; स्वच्छ हवा मिळणे हा सर्व नागरिकांचा हक्क