राष्ट्रीय

जम्मू-काश्मिरात दगडफेकीचे प्रकार ९१ टक्के घटले

३७० कलम हटवल्यानंतरचा परिणाम

नवशक्ती Web Desk

श्रीनगर : जम्मू-काश्मिरात कलम ३७० हटवल्यानंतर दगडफेकीच्या घटना ९१ टक्के कमी झाल्या आहेत. २०१५ ते २०१९ दरम्यान ५०६३ दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या, तर २०१९ ते २०२३ दरम्यान ४३४ घटना घडल्या.

दहशतवादी व त्यांच्या साथीदारांना होणाऱ्या अटकेचे परिणाम ५ पट वाढले आहेत. २०१५ ते २०१९ दरम्यान ४२७ दहशतवाद्यांना अटक झाली होती, तर

२०१९ ते २०२३ दरम्यान २३२७ दहशतवाद्यांना पकडले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी कलम ३७० हटवण्यापूर्वी व नंतरच्या ४ वर्षांतील गुन्हेगारी घटनांची माहिती जारी केली. २०१५ ते २०१९ दरम्यान ३२९ सुरक्षा दलांच्या जवानांचा मृत्यू झाला. २०१९ ते २०२३ दरम्यान १४६ सुरक्षा दलांच्या जवानांचा मृत्यू झाला.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश