(संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

महाराष्ट्र, झारखंडमध्ये इंडिया आघाडी एकत्र लढणार; जयराम रमेश यांनी केले स्पष्ट

हरयाणा आणि दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि ‘आप’ची आघाडी होण्यास फारसा वाव नाही, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले.

Swapnil S

नवी दिल्ली : हरयाणा आणि दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि ‘आप’ची आघाडी होण्यास फारसा वाव नाही, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले.

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये इंडिया आघाडी विधानसभा निवडणूक एकत्रित लढणार आहे, असेही रमेश यांनी म्हटले आहे.

राज्यातील निवडणुकांसाठी इंडिया आघाडीत केवळ एकच सूत्र नाही, राज्यांमध्ये काँग्रेसचे नेते आणि आघाडीतील भागीदार यांच्यात सहमती झाल्यास आघाडी एकत्र लढेल, असेही रमेश यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

पंजाबमध्ये इंडिया गठबंधन नाही, हरयाणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही एक जागा आपला दिली, मात्र विधानसभेच्या निवडणुकीत इंडिया गठबंधन असेल असे आपल्याला वाटत नाही. दिल्लीत ‘आप’नेच विधानसभा निवडणुकीत आघाडी नसल्याचे स्पष्ट केले आहे, असेही ते म्हणाले.

Mumbai : गोरेगाव-मुलुंड २० मिनिटांत; जीएमएलआर प्रकल्पात ‘तुळशी’ खोदणार बोगदा, नॅशनल पार्कखाली भूमिगत बोगदा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : मुख्य आरोपी सचिन अंदूरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती, HC चा मोठा निर्णय

बापरे! मध्यान्ह भोजनात मिठाऐवजी चक्क डिटर्जंट? जेवणानंतर २४ हून अधिक विद्यार्थी रुग्णालयात दाखल, VIDEO

संतापजनक! पालघरमध्ये १० वर्षांच्या मुलीवर ५० वर्षीय काकाकडून अत्याचार; FIR नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ? कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Mumbai : चर्चगेट येथील मुलींच्या हॉस्टेलमधील पाणीटंचाईची हायकोर्टाकडून दखल; महापालिका आणि विद्यापीठाला नोटीस