राष्ट्रीय

इंडिया आघाडीला सनातन धर्म पुसून टाकायचा आहे : ज्योतिरादित्य शिंदे

प्रचंड जनक्षोभाचा सामना करावा लागेल, असा आरोप केला

नवशक्ती Web Desk

ग्वाल्हेर : काँग्रेसप्रणीत विरोधी इंडिया आघाडी महात्मा गांधींचा सनातन धर्म पुसून टाकू इच्छित आहे. पण त्यांनी व्यापक जनक्षोभ पाहून भोपाळमधील नियोजित रॅली रद्द केली, असा आरोप केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी रविवारी केला. विश्वकर्मा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते ग्वाल्हेरमध्ये आले होते.

विरोधक आघाडीला सनातन धर्म नष्ट करायचा आहे, देशभरात भ्रष्टाचार पसरवायचा आहे, घराणेशाहीचे राजकारण करायचे आहे आणि तुष्टीकरण करायचे आहे. विरोधी आघाडीने महात्मा गांधींचा सनातन धर्म पुसून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, त्यांना प्रचंड जनक्षोभाचा सामना करावा लागेल, असा आरोप त्यांनी केला.

चौदा टेलिव्हिजन अँकरच्या शोवर बहिष्कार घालण्याच्या इंडिया आघाडीच्या निर्णयाबद्दल विचारले असता शिंदे म्हणाले की, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाविरुद्ध भेदभाव करणे काँग्रेसच्या डीएनएमध्ये आहे. काँग्रेसने वेळोवेळी संविधानाचा नाश केला आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत