राष्ट्रीय

इंडिया आघाडीला सनातन धर्म पुसून टाकायचा आहे : ज्योतिरादित्य शिंदे

प्रचंड जनक्षोभाचा सामना करावा लागेल, असा आरोप केला

नवशक्ती Web Desk

ग्वाल्हेर : काँग्रेसप्रणीत विरोधी इंडिया आघाडी महात्मा गांधींचा सनातन धर्म पुसून टाकू इच्छित आहे. पण त्यांनी व्यापक जनक्षोभ पाहून भोपाळमधील नियोजित रॅली रद्द केली, असा आरोप केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी रविवारी केला. विश्वकर्मा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते ग्वाल्हेरमध्ये आले होते.

विरोधक आघाडीला सनातन धर्म नष्ट करायचा आहे, देशभरात भ्रष्टाचार पसरवायचा आहे, घराणेशाहीचे राजकारण करायचे आहे आणि तुष्टीकरण करायचे आहे. विरोधी आघाडीने महात्मा गांधींचा सनातन धर्म पुसून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, त्यांना प्रचंड जनक्षोभाचा सामना करावा लागेल, असा आरोप त्यांनी केला.

चौदा टेलिव्हिजन अँकरच्या शोवर बहिष्कार घालण्याच्या इंडिया आघाडीच्या निर्णयाबद्दल विचारले असता शिंदे म्हणाले की, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाविरुद्ध भेदभाव करणे काँग्रेसच्या डीएनएमध्ये आहे. काँग्रेसने वेळोवेळी संविधानाचा नाश केला आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत