दहशतवादाविरुद्ध निर्णायक पाऊल; केंद्र सरकारचे ‘प्रहार’ धोरण जारी प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

दहशतवादाविरुद्ध निर्णायक पाऊल; केंद्र सरकारचे ‘प्रहार’ धोरण जारी

केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘प्रहार’ या नावाने देशाचे पहिले व्यापक दहशतवादविरोधी धोरण जारी केले आहे. त्यामध्ये सीमापार दहशतवादाचा उल्लेख असून गुन्हेगारी हॅकर्स आणि सायबर हल्ल्यांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘प्रहार’ या नावाने देशाचे पहिले व्यापक दहशतवादविरोधी धोरण जारी केले आहे. त्यामध्ये सीमापार दहशतवादाचा उल्लेख असून गुन्हेगारी हॅकर्स आणि सायबर हल्ल्यांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

देशाला भूमी, जल आणि वायू या तीनही मार्गांनी दहशतवादी धोक्याचा सामना करावा लागतो. भारत दहशतवादाला कोणत्याही विशिष्ट धर्म, वंश, राष्ट्रीयत्व अथवा संस्कृतीशी जोडत नाही. दहशतवादी गट रसद आणि भरतीसाठी संघटित गुन्हेगारी नेटवर्कचा वापर वाढत्या प्रमाणात करीत आहेत, असे धोरणात म्हटले आहे.

दहशतवादी गट भारतीय तरुणांना भरती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकदा ओळख पटल्यानंतर पोलीस अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई करतात, तसेच सामाजिक आणि धार्मिक नेत्यांची भूमिकाही धोरणात अधोरेखित करण्यात आली आहे.

‘अल-कायदा’ आणि ‘आयसिस’ यासारख्या जागतिक दहशतवादी गटांच्या नावांचा उल्लेख करीत धोरणात म्हटले आहे की, त्यांनी स्लीपर सेलद्वारे भारतामध्ये हिंसाचार भडकविण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी केंद्र सरकारचे नवे नियम; व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी नोंदणी आवश्यक, जाणून घ्या सविस्तर

Mumbai : बेस्ट वसाहतीला BMC ची नोटीस; श्वानांना अन्न देण्यावरून घर रिकामे करण्याची धमकी देणे आले अंगाशी

'फी भरली नाही' म्हणून मित्र-मैत्रिणींसमोर अपमान; १७ वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, मृत्यूपूर्वीचा Video व्हायरल, शिक्षकांविरोधात गुन्हा

Mumbai : सीएसएमटी ते बोरिवली प्रवास होणार सोपा! हार्बर लाईन विस्तार प्रकल्पाला वेग; पश्चिम रेल्वेकडून ८६.५१ कोटींची निविदा

Thane : उल्हासनगरमध्ये ट्रॅफिक जामला लगाम! पाच प्रमुख रस्त्यांवर २४ तास नो-पार्किंग; वाहतूक पोलिसांची अधिसूचना जारी