राष्ट्रीय

भारतीय हवाई क्षेत्र पूर्णत: सुरक्षित-डीजीसीएचे प्रमुख अरुण कुमार

देशाच्या एअरलाइन उद्योगात अलीकडच्या काळात काही किरकोळ त्रुटींनंतर गोंधळ निर्माण होणे दुर्दैवी आहे

वृत्तसंस्था

भारतीय हवाई क्षेत्र पूर्णत: सुरक्षित आहे. आंतरराष्ट्रीय नागरी हवाई संघटनेकडून जे काही नियम घालून देण्यात आले आहे, त्याची अंमलबजावणी केली जात आहे, असे डीजीसीएचे प्रमुख अरुण कुमार ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

डीजीसीए अर्थात डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन या हवाई कंपन्यांच्या नियामक संस्थेने म्हटले आहे की, देशाच्या एअरलाइन उद्योगात अलीकडच्या काळात काही किरकोळ त्रुटींनंतर गोंधळ निर्माण होणे दुर्दैवी आहे. त्रुटी दूर करून आम्हाला विमान वाहतूक मानकांचे पालन करत विमान चालवायचे आहे. ही एक प्रक्रिया आहे जी सतत चालू असते. विमान एक जटिल मशीन आहे आणि त्यात अनेक भाग आहेत. ते किरकोळ त्रुटींना बळी पडतात; परंतु मानकांचे पालन करताना त्यांचा हवाई ऑपरेशनसाठी वापर करणे सुरू ठेवता येते. डीजीसीएचे डीजी अरुण कुमार म्हणाले की होय हे खरे आहे की गेल्या काही दिवसांत अनेक उड्डाणे वळवण्यात आली, अनेक विमाने परत करावी लागली किंवा नाकारली गेली. टेक ऑफ करताना अनेक वेळा गडबड झाली आणि इमर्जन्सी लँडिंग सावधगिरीच्या किंवा प्राधान्याच्या आधारावर करण्यात आले, अनेक वेळा चुकल्यामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे फ्लाइट रद्द करावी लागली पण तुम्ही मला सांगा या समस्या कोणत्या एव्हिएशन मार्केटमध्ये दिसत नाहीत? दुसरीकडे, डीजीसीएने सांगितले की, अलीकडच्या काही दिवसांत वेगवेगळ्या एअरलाइन्समध्ये अभियांत्रिकी संबंधित घटनांमध्ये वाढ झाल्याच्या अहवालाच्या आधारे, डीजीसीएने अनेक ऑडिट आणि स्पॉट चेक केले ज्यामध्ये असे आढळले की विमानातील दोष दुरुस्त करण्यात आले.

''तेव्हाच थांबायला हवं होतं''; प्रकाश महाजन यांची मनसेला सोडचिठ्ठी, नाराजीचे कारण समोर

भारत-पाकिस्तान सामना : ''देशभक्तीचा व्यापार सुरू''; उद्धव ठाकरे यांचे भाजपवर टीकास्त्र

"BCCI च्या कुटुंबाचं कोणी मेलं नाही"; भारत-पाक सामन्यावर भडकली पहलगाम हल्ल्यातील पिडीतेची पत्नी; क्रिकेटर, स्पॉन्सर्सना घेतलं धारेवर

रक्त व क्रिकेट एकत्र कसे असू शकते? भारत-पाकिस्तान सामन्यावरून आदित्य यांची टीका

संपूर्ण देशात फटाक्यांवर बंदी हवी; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; स्वच्छ हवा मिळणे हा सर्व नागरिकांचा हक्क