नरेंद्र मोदी FPJ
राष्ट्रीय

"EVM जिवंत आहे की मेलीये..." पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा

"४ जूनला निकाल सुरु होता. मला अनेकांचे कॉल येत होते. मी म्हटलं, ते आकडे वगैरे राहूद्या...मला हे सांगा ईव्हीएम जीवंत आहे की मेलं?..." नेमकं काय म्हणाले मोदी?

Suraj Sakunde

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईव्हीएमवरून विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. शुक्रवारी जुन्या संसद भवनात आयोजित एनडीए आघाडीच्या नवनियुक्त खासदारांच्या बैठकीत ते बोलत होते. विरोधी पक्ष सातत्यानं ईव्हीएमवर शंका उपस्थित करत होते, मात्र लोकसभा निवडणूकीच्या निकालांनी त्यांना शांत केलं, असं नरेंद्र मोदी म्हणाले. 'ईव्हीएम जिवंत आहे की मेलं?' असा प्रश्न करत त्यांनी विरोधकांना डिवचलं.

नेमकं काय म्हणाले मोदी?

नरेंद्र मोदी म्हणाले की, "४ जूनला निकाल सुरु होता. मला अनेकांचे कॉल येत होते. मी म्हटलं, ते आकडे वगैरे राहूद्या...मला हे सांगा ईव्हीएम जिवंतआहे की मेलं? कारण या लोकांनी (विरोधी पक्ष) ठरवलं होतं की, भारतातील लोकशाही आणि लोकशाही प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास उडावा. सतत ईव्हीएमला शिव्या दिल्या जात होत्या. मला तर वाटत होतं ईव्हीएमची अंत्ययात्रा वगैरे काढतायत की काय? मात्र ४ जून येता येता त्यांच्या तोंडाल कुलूप लागलं. ईव्हीएमनं त्यांना गप्प केलं. हीच ताकद आहे भारतीय लोकशाहीची. हीच ताकद आहे भारताच्या निपक्षपातीपणाची..."

ही एकच टोळी होती...

मोदी पुढे म्हणाले की, "या निवडणूकीदरम्यान मी पहिल्यांदाच पाहिलं की, प्रत्येक तिसऱ्या दिसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाच्या कामात अडथळा यावा, यासाठी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले जात होते. ही एकच टोळी होती. लोकशाहीवर ज्यांचा अजिबात विश्वास नाही, असे लोक सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून कशापद्धतीने अडथळा आणला जाईल, यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळं ऐन निवडणूकीदरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा हिस्सा न्यायालयात सामना करत होता. निवडणूकीत काहीही निकाल येऊद्या, जगाच्या समोर निवडणूक आयोगाचं नाव बदनाम करण्याचा हा डाव होता."

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : नगरपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात, संपूर्ण राज्याचं निकालाकडे लक्ष; कोण मारणार बाजी?

महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकारणातील 'हेल्दी' संबंध संपले; भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांची खंत

आता टोल नाक्यांवर AI; जाता येणार ८०च्या वेगाने; थांबण्याची, ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण : पार्थ पवार यांच्या सहीचे बनावट पत्र व्हायरल; आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल

राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचा आज निकाल; शनिवारी ६० टक्के मतदान