Photo : X
राष्ट्रीय

किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा मृत्यू; ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता

जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात गुरुवारी झालेल्या ढगफुटीनंतर आतापर्यंत ६५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्यापही अनेक लोक पाण्यात आणि ढिगाऱ्यात अडकले आहेत. मृतांपैकी ४० जणांची ओळख पटली असून १६७ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

Swapnil S

किश्तवाड/जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात गुरुवारी झालेल्या ढगफुटीनंतर आतापर्यंत ६५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्यापही अनेक लोक पाण्यात आणि ढिगाऱ्यात अडकले आहेत. मृतांपैकी ४० जणांची ओळख पटली असून १६७ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

त्यापैकी ३८ जणांची प्रकृती गंभीर आहे, तर १०० हून अधिक जण अद्यापही बेपत्ता असल्याचे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

माता यात्रेसाठी माचैल किश्तवाडमधील पद्दार उपविभागातील चशोटी गावात हजारो भाविक पोहोचले होते तेव्हा ही दुर्घटना घडली. सदर यात्रेचा हा पहिला थांबा आहे. यात्रा जेथून सुरू होणार होती त्या ठिकाणी ढगफुटी झाली. त्यानंतर बसेस, तंबू, लंगर आणि भाविकांची अनेक दुकाने होती ती सर्व पुरात वाहून गेली. किश्तवाडचे उपायुक्त पंकज शर्मा म्हणाले की, एनडीआरएफची टीम शोध-बचावकार्यात गुंतली आहे. आणखी दोन पथके मार्गावर आहेत. प्रत्येकी ६० जवानांची पाच लष्करी पथके व्हाइट नाइट कॉप्सचे वैद्यकीय पथक, जम्मू आणि काश्मीर पोलीस, एसडीआरएफ आणि इतर एजन्सी या ऑपरेशनमध्ये गुंतले आहेत.

पावसाचा कहर! मुंबईत शाळा-कॉलेजना सुट्टी; रेड अलर्ट जारी; ठाणे-रायगडलाही अतिमुसळधारचा इशारा, महाराष्ट्रात सर्वदूर कोसळधार

बेस्ट क्रेडिट सोसायटी निवडणुकीसाठी आज मतदान; मनसे-शिवसेना युतीला सहकार समृद्धी पॅनलचे आव्हान

हा संविधानाचा अपमान! राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्र द्यावे, अन्यथा माफी मागावी; मतचोरीच्या आरोपांवर EC चे आव्हान

कोल्हापूरला लवकरच खंडपीठाचा दर्जा! सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आश्वासन; सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

मुलाला नैसर्गिक पालकाच्या मायेपासून वंचित ठेवू नये - न्यायालय; अपहरण प्रकरणातील आईला जामीन