राष्ट्रीय

पाडकामाची कारवाई कायदेशीर पद्धतीने होणे आवश्यक-सुप्रिम कोर्ट

न्यायालयाने यावेळी पाडकामाची कारवाई करताना कायद्याचे पालन व्हावे, असेही नमूद केले आहे

वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या बुलडोझर कारवाई प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने संबंधितांना कायदेशीर नोटीस दिल्याशिवाय राज्य सरकारला बांधकाम पाडता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारला पुढील तीन दिवसात याप्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने यावेळी पाडकामाची कारवाई करताना कायद्याचे पालन व्हावे, असेही नमूद केले आहे.

‘जमियत उलेमा-ए-हिंद’ने उत्तर प्रदेश सरकारच्या बांधकाम पाडण्याच्या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच सरकारकडून कोणतीही नोटीस न देता विशिष्ट समुदायाच्या नागरिकांची घरे पाडून त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला.तसेच याचिकाकर्त्यांनी राज्य सरकारने कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्याशिवाय बांधकाम पाडू नये आणि असे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश देण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.

“कानपूर हिंसाचारातील संशयितांची घरे बुलडोझरने पाडू, असे वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले हे भयावह आहे. आम्ही असे प्रकार या देशात कधीही पाहिलेले नाहीत. आणीबाणीत किंवा स्वातंत्र्याच्या आधीही असे कधीही झालेले नाही. सरकारने केवळ संशयितांचीच नाही, तर त्यांच्या पालकांचीही घरे जमीनदोस्त केली. कायद्याच्या राज्यात असे होऊ शकत नाही,” असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भीषण अपघात; साखरझोपेत असताना २ चिमुकल्यांना अज्ञात वाहनाने चिरडले, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

भारत आणि रशियाला आम्ही गमावले! ट्रम्प यांना उशिरा सुचले शहाणपण