राष्ट्रीय

भाजपकडून तृणमूलचे नेते, कार्यकर्ते यांना धमक्या

Swapnil S

कोलकाता : भाजपमध्ये प्रवेश करावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे, अशा आशयाच्या धमक्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून दिल्या जात असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी येथे केला.

पुरुलिया जिल्ह्यात एका निवडणूक सभेत त्या बोलत होत्या. सक्तवसुली संचालनालय (ईडी), सीबीआय, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि आयकर विभाग हे भाजपची शस्त्रे म्हणून काम करीत आहेत, असा आरोपही ममतांनी केला. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचा छळ करण्यासाठी वरील यंत्रणांचा वापर केला जात आहे. पूर्वसूचनेविनाच छापे टाकले जात असून घरात जबरदस्तीने घुसण्याचे प्रकारही घडत आहेत. रात्री सर्वजण निद्रावस्थेत असताना कोण घरात घुसला तर महिलांनी काय करायचे, असा सवालही ममतांनी केला.

भाजपमध्ये प्रवेश करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशा धमक्या मध्यवर्ती यंत्रणांकडून तृणमूलचे नेते आणि कार्यकर्त्यांना दिल्या जात आहेत, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. मनरेगा, पीएम-आ‌वास योजनेच्या निधीपासून पश्चिम बंगालला वंचित ठेवले जात असल्याचेही त्या म्हणाल्या.

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान