राष्ट्रीय

मणिपूरमध्ये ४ महिन्यांनंतर मोबाइल, इंटरनेट सेवा सुरू मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांची घोषणा

दोन महिन्यांत परिस्थिती सुधारली आहे

नवशक्ती Web Desk

इम्फाळ : मणिपूरमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला वांशिक हिंसाचार भडकल्याने बंद करण्यात आलेल्या मोबाईल, इंटरनेट सेवा शनिवारपासून चार महिन्यांहून अधिक कालावधीनंतर पूर्ववत करण्यात आल्या. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी सकाळी यासंदर्भात घोषणा केल्यानंतर काही तासांनी सेवा पुन्हा सुरू झाल्या.

येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना सिंह म्हणाले, खोट्या बातम्या, अपप्रचार आणि द्वेषपूर्ण भाषणांचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने ३ मे रोजी मोबाईल इंटरनेट सेवा निलंबित केली होती. मात्र, परिस्थिती सुधारल्यानंतर संपूर्ण राज्यात मोबाईल इंटरनेट सेवा पूर्ववत केली जाईल.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकार बेकायदेशीर स्थलांतरितांच्या प्रश्नावर काम करत राहील. तसेच त्यांनी भारत-म्यानमार सीमेवर पूर्ण कुंपण घालण्याच्या गरजेवर भर दिला. केंद्रीय गृह मंत्रालयाने मणिपूरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर ६० किमी कुंपण घालण्यासाठी पावले उचलली आहेत. गेल्या दोन महिन्यांत परिस्थिती सुधारली आहे आणि असुरक्षित भागात सुरक्षा दलांच्या तैनातीमुळे गोळीबाराच्या घटनांमध्ये घट झाली आहे, असेही ते म्हणाले.

Mumbai : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा अन् नववर्षाचा जल्लोष; मुंबई, ठाणे, डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रा

Air Travel Alert : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' ४ विमानतळांवर बंदी; फ्लाइट्सवर होणार परिणाम

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खरेदी धोरणावर परिणाम होणार

Nagpur : मॅट्रिमोनियल साईटवरील ओळख महागात पडली; मॉर्फ अश्लील व्हिडिओने ३६ वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल

भिवंडीत फर्निचर मार्केटला भीषण आग; अनेक दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली