राष्ट्रीय

‘आत्मनिर्भर’ता हाच विकसित भारताकडे जाण्याचा मार्ग; ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

नागरिकांना ‘स्वदेशी’ उत्पादनांचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. येत्या काही आठवड्यांत सणांचा हंगाम शिगेला पोहोचणार असल्याचे सांगत त्यांनी ‘वोकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ हाच विकसित भारताकडे जाण्याचा मार्ग असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले.

Swapnil S

नवी दिल्ली: नागरिकांना ‘स्वदेशी’ उत्पादनांचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. येत्या काही आठवड्यांत सणांचा हंगाम शिगेला पोहोचणार असल्याचे सांगत त्यांनी ‘वोकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ हाच विकसित भारताकडे जाण्याचा मार्ग असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले.

‘मन की बात’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, जीवनात जे काही आवश्यक आहे ते स्वदेशी असावे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 50 टक्के शुल्क लावल्यानंतर दोन्ही देशांतील संबंधांमध्ये आलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी पुन्हा एकदा आत्मनिर्भरतेवर भर दिला.

गणेशोत्सव साजरा होत असताना व आगामी नवरात्र, दुर्गापूजा व दिवाळीच्या काळात भेटवस्तू, कपडे, सजावटीच्या वस्तू किंवा इतर कोणत्याही खरेदीत ‘स्वदेशी’ उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी आवाहन केले.

मोदी म्हणाले, “अभिमानाने म्हणा हे स्वदेशी आहे, अभिमानाने म्हणा हे स्वदेशी आहे, अभिमानाने म्हणा हे स्वदेशी आहे. याच भावनेने पुढे जायचे आहे. एकच मंत्र आहे – वोकल फॉर लोकल; एकच मार्ग आहे – आत्मनिर्भर भारत; आणि एकच ध्येय आहे – विकसित भारत.”

मोदी यांनी रामायण व भारतीय संस्कृतीबद्दल जगभर वाढत असलेल्या आकर्षणाचा उल्लेख केला. याच महिन्यात कॅनडातील मिसिसॉगा येथे भगवान रामाची ५१ फूट उंचीची मूर्ती उभारण्यात आली, तर रशियातील व्लाडिवोस्टॉक येथे रामायणावर आधारित रशियन मुलांच्या चित्रांचे अनोखे प्रदर्शन झाले, असे त्यांनी सांगितले.

मुंबईत गंभीर गुन्हेगारीत वाढ; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खुनाच्या गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ

Navi Mumbai : एनआरआय फ्लेमिंगो तलावावर पर्यटकांची झुंबड; DPS, TSC वेटलँड्स पुनर्जीवित करा, पर्यावरणवाद्यांची राज्य सरकारकडे मागणी

Nashik : त्र्यंबकेश्वरला अडीच हजारांत ‘ब्रेक दर्शन’ योजना; आठ मिनिटांत होणार दर्शन

Mumbai : रसायन, भौतिकशास्त्र विभागांचा स्वायत्त दर्जा कायम; मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय

दहा हजार माथाडींसमोर बेकारीचा धोका; जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर करणार आंदोलन